Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के!

इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 03:45 PM2021-01-19T15:45:50+5:302021-01-19T15:46:20+5:30

whatsapp join usJoin us
India move to the No.1 spot in ICC World Test Championship & become the new No.2 in the Test Team Rankings | Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के!

Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 4th Test Day 5 : टीम इंडियानं गॅबा कसोटीत इतिहास घडवताना चार सामन्यांची मालिका २-१अशी जिंकली. टीम इंडियानं सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर चषक ( Border–Gavaskar Trophy)  आपल्याकडे ठेवला. २०१७ ( भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावस्कर चषक स्वतःकडे ठेवला. या १९८८नंतर गॅबा कसोटीत ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला. या धक्कादायक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी दोन जबरदस्त हादरे बसले. 

पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मायदेशात परतला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज कांगारूंकडून टीम इंडियाचा ४-० असा पराभव, हा निकाल लावून मोकळे झाले. पण, अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडनं कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. भारतानं मालिकेत फक्त कमबॅक केले नाही, तर २-१ असा विजय मिळवून दिला.  

शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा केल्या. पुजारानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ करताना १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा चोपल्या.

या विजयाबरोबर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( ICC World Test Championship) अव्वल स्थान पटकावताना ऑस्ट्रेलियाला थेट तिसऱ्या स्थानी फेकले. भारतानं या विजयानंतर ७१.७ टक्केवारीनुसार हे अव्वल स्थान पटकावले. यासह टीम इंडियानं  ICC World Test Championshipचं फायनलचं तिकीट जवळपास पक्कं केलं आहे.


शिवाय कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर खेचले. टीम इंडिया आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: India move to the No.1 spot in ICC World Test Championship & become the new No.2 in the Test Team Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.