भारतीय संघ 2020मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी न्यूझीलंड येथे दाखल झाला आहे. बीसीसीआयनं या दौऱ्यासाठी ट्वेंटी-20 संघ आधीच जाहीर केला होता आणि मंगळवारी त्यांनी वन डे संघाचीही घोषणा केली. या दोन्ही संघांत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला स्थान दिलेले नाही. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता हार्दिक हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या दुखापतीबाबत कोणताही धोका संघाला पत्करायचा नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं त्याला विश्रांती देणे पसंत केले आहे. पण, या विश्रांतीत हार्दिक सध्या काय करतोय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला एक फोटो पाहून मिळेल.
हार्दिक दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल अशी शक्यता होती, परंतु तसेही झाले नाही. तो अजूनही तंदुरुस्त नसल्यामुळे त्याची निवड न झाल्याच्या चर्चा होत्या, परंतु हार्दिक स्वतःच्या फिटनेसवर समाधानी नसल्यानं त्यानं किवी दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी हार्दिकनं टीम इंडियासोबत नेटमध्ये सरावही केला होता.
हार्दिक आता थेट मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून दिसण्याची शक्यता आहे किंवा तो इंडियन प्रीमिअर लीगमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय होऊ शकतो. विश्रांतीवर असलेला हार्दिक सध्या तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेतच आहे, शिवाय तो त्याच्या प्रेयसीलाही पुरेसा वेळ देत आहे. हार्दिक आणि नताशा स्टँकोव्हिच यांचा रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात हार्दिक नताशाच्या खांद्यावर डोकं ठेवलेला दिसत आहे.
हार्दिकनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशाला लग्नाची मागणी घातली होती आणि त्यानं तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्टही केला होता.
दुखापतीमुळे नव्हे, तर 'या' कारणामुळे हार्दिक पांड्याची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!
Social Viral : हार्दिक-नताशाचा सुपर'हॉट'फोटो!
'कॉफी विथ करण'मधील वादावर हार्दिक पांड्यानं सोडलं मौन, म्हणाला...
साखरपुड्यानंतर नताशासोबत Romantic मूडमध्ये दिसला हार्दिक, पाहा व्हायरल फोटो
Web Title: Hardik Pandya and Natasa Stankovic in romantic mood, see pic
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.