शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

आता सुरुवातीलाच वैद्यकीय चाचणी

By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पोलीस भरतीच्या वेळी मुंबईमध्ये आतापर्यंत ५ उमेदवारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी भरतीसाठी घेतल्या जणाऱ्या

औरंगाबाद : पोलीस भरतीच्या वेळी मुंबईमध्ये आतापर्यंत ५ उमेदवारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी भरतीसाठी घेतल्या जणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणींमध्ये आजपासून आमूलाग्र बदल केले आहेत. विशेषत: गुरुवारपासून संबंधित उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच जे उमेदवार ‘फीट’ आढळले, त्यांनाच धावण्याच्या चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले. यासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, पोलीस भरतीसाठी खबरदारी घेण्याबाबत महासंचालक कार्यालयाकडून काही निर्देश मिळाले होते. त्यानुसार आम्ही उमेदवारांची काळजी घेत आहोत. ठराविक उमेदवारांना भरतीसाठी निमंत्रित केल्यानंतर पहाटे ५.१५ वाजेपासून त्यांची कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर त्यांची उंची, छाती मोजल्यानंतर १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाते. त्यानंतर गोळाफेक, थाळीफेक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत उन्हाच्या अगोदर घेतल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच विद्यापीठ परिसरात पात्र उमेदवारांची ५ किलोमीटर लांब धावण्याची चाचणी घेतली जाते. तत्पूर्वी, आदल्या दिवशी घाटी हॉस्पिटलच्या ५ तज्ज्ञ डॉक्टर व ५ सहायक, अशा १० जणांच्या पथकामार्फत संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या चाचणीत जे उमेदवार फीट असतील, त्यांनाच दुसऱ्या दिवशी सकाळी ५ किलोमीटर धावण्यासाठी पात्र समजले जाते. वैद्यकीय चाचणीतून कोणाला डायबेटीस, हायपर टेन्शन, बीपी अथवा अन्य आजार निष्पन्न झाला, तर त्यांना धावण्याच्या चाचणीसाठी अपात्र ठरविले जाते. गुरुवारपासूनच वैद्यकीय चाचणीमध्ये बदल करण्यात आला आहे.