शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

119 बैठे पथकांची परीक्षेवर नजर

By admin | Updated: February 20, 2015 00:07 IST

उस्मानाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ११९ बैठी पथके निर्माण करण्यात आली आहेत.

उस्मानाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ११९ बैठी पथके निर्माण करण्यात आली आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीही नऊ भरारी पथकेही निर्माण केली आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने चार-पाच वर्षापासून कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत. या अभियानामुळे पहिल्या वर्षी निकालाचा टक्का घसरला. मात्र, त्यानंतर सातत्याने निकाल उंचावत आहे. तसेच परिक्षेदरम्यान, गैरप्रकार करणाऱ्यांची संख्याही कमी होवू लागली आहे. यंदाही दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, यासाठी जवळपास १४ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३७ केंद्रांवर त्यांच्या परिक्षेचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येकी एक या प्रमाणे केंद्रांवर ३७ बैठी पथके तळ ठोकून राहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतच प्र्राथमिक, माध्यमिक, निरंतर विभागचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षण अधिकारी, ‘डायट’चे प्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेट देतील. या परीक्षेदरम्यान कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एका बैठकीमध्ये दिले आहेत. दरम्यान, दहावीच्या परिक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. सदरील परिक्षेसाठी ८२ केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रांवरही ८२ बैठी पथके तैनात असतील. त्याचप्रमाणे नऊ भरारी पथकांचीही नजर असणार आहे. तसेच आवश्यक केंद्रांवर पोलिस कर्मचारीही दिले जाणार आहेत.बैठे पथकात तीन सदस्यपेपरला सुरूवात झाल्यापासून ते संपेपर्यंत सदरील बैठी पथके परीक्षा केंद्रांवर थांबणार आहेत. एका पथकामध्ये पथक प्रमुख, एक सहाय्यक आणि एका महिला अधिकारी वा कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)