शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

मालधक्क्यावरील धान्य व खताची नासाडी

By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST

जालना : येथील रेल्वेच्या मालधक्क्यात उघड्यावर साठविण्यात आलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ व खत भिजल्याने प्रचंड नुकसान झाले.

 जालना : येथील रेल्वेच्या मालधक्क्यात उघड्यावर साठविण्यात आलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ व खत भिजल्याने प्रचंड नुकसान झाले. रविवारी रात्री अचानक रोहिण्यांचा पाऊस बसरल्याने हे नुकसान झाले. मात्र, या नुकसानीची कोठेही नोंद घेण्यात आली नाही. रेल्वे व्हॅगनचे भाडे वाचविण्यासाठी कंत्राटदाराने जवळपास १५०० पोते तांदूळ मोकळ्या जागेत उतरून घेतला होता. मालधक्क्याच्या फलाटावरच तांदळाच्या पोत्यांच्या सात थप्पी लावण्यात आल्या होत्या. त्यातील दोन थप्पीवर ताडपत्री टाकण्यात आली होती. उर्वरित तसेच सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे कंत्राटदाराने या नुकसानीची कोठेही नोंद केली नाही. हा माल उचलून थेट गोदामात पाठविण्यात आला. त्यामुळे कोंदट वातावरणात हा तांदूळ सडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून अनेक पोते फोडून माल उघड्यावर टाकण्यात आला होता. ठिकठिकाणी तांदळाचे ढीग लागले होते. त्या तांदळाची पूर्णत: नासाडी झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने वरच्या भागातील पोत्यांमधील तांदूळ खराब झाला असावा, जास्त काही नुकसान झाले नसावे, असा पोकळ दावा करण्यात आला. ही जबाबदारी कोणाची हे नेमकेपणाने कोणीच सांगण्यास तयार नाही. उघड्यावर माल टाकून नुकसान करण्यात आले आहे. महाराष्ट्र मार्केटिंगच्या गोदामात साठविण्यात आलेले खतही पाण्याने भिजले आहे. पिवळ्या पोत्यातील हे खत कोणतीही चौकशी न करता गोदामात उतरून घेण्यात आले आहे. खताचे २ हजाराच्या जवळपास पोते उघड्यावर पडून होते. मालधक्क्याची जबाबदारी असणारे अधिकारी माध्यमांचे प्रतिनिधी आल्यामुळे निघून गेले. त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच मालधक्क्यावर गव्हाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून रेल्वे व संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. त्यावेळीही हजारो क्विंटल गहू उघड्यावर पडला होता. पोती फोडून गव्हाची चोरीही झाली होती. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शासनाचे हजारो क्विंटल धान्याचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी) कोणालाही सोयर सुतक नाही येथील रेल्वे मालधक्क्यावर नियमितपणे मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक करण्यात येते. विशेषत: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या धान्यासह खते व इतर कृषी मालाची आवक होते. हा माल नेहमीच उघड्यावर साठविला जातो. त्यामुळे पोती फोडून धान्याची चोरी होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे हजारो क्विंटल मालाचे मोठे नुकसान झाले. एवढे होऊनही संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनाचा कुणीही अधिकारी- कर्मचारी इकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी आलेल्या या धान्याची नासाडी होत असून, शासनाचेच नुकसान होत आहे, ही गंभीर बाब आहे.