शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

आधरवाडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST

केळगाव : येथून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून केळगाव, आधरवाडी, तांडा, कोल्हाळा या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातील ...

केळगाव : येथून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून केळगाव, आधरवाडी, तांडा, कोल्हाळा या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातील पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे असताना मात्र, विद्युत मोटारी टाकून अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाणी उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.

आधरवाडी धरणातून चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून या धरणातून हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. काही शेतकरी अवैधरित्या धरणात विद्युत मोटार टाकत असून पाणी उपसा करू लागले. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या चारही गावाला पिण्याचे पाण्यासाठी दुसरा स्रोत नाही. त्यामुळे हा अवैधरित्या होणारा पाणी उपसा थांबविला नाही तर भविष्यात भीषण पाणीटंचाई होणार आहे. धरण प्रमुख अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी याकडे कानाडोळ‌ा केला आहे.

काय म्हणतात लोक...

केळगाव

आधरवाडी धरणावर सुरू असलेला पाणी उपसा बंद करावा, यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अजूनही काही शेतकरी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात गावालाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

- लताबाई वाघमोडे, सरपंच.

केळगावपासून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. काही शेतकरी रात्री मोटारी सुरू करून पिकांना पाणी देत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- साहेबराव पवार, तांडा, ग्रामस्थ.

------

फोटो

: केळगावजवळील आधरवाडी येथील धरणातील उपलब्ध साठ्यातून पाण्याची चोरी केली जात आहे.