शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

वडिलांचा हात मोडला अन् मुलीच्या हाती आले कोयते !

By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST

उस्मानाबाद : पाऊस न पडल्याने खरीप हाती लागले नाही. अन् रबीची पेरणी होवू शकली नाही.

उस्मानाबाद : पाऊस न पडल्याने खरीप हाती लागले नाही. अन् रबीची पेरणी होवू शकली नाही. त्यामुळे पाच-सहा एकर माळरान जमीन असूनही केज तालुक्यातील मांडवखेल येथील कदम दाम्पत्य पोटाचे खळगे भरण्यासाठी बैलगाडी घेवून ऊसतोडीला आले. मात्र पंधरा ते वीस दिवसांपूर्वी गाडीवरून पडून आत्माराम कदम यांचा हात मोडला अन् आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या आत्माराम यांच्या अवघ्या १४ वर्षीय कन्येला शाळा सोडून हाती कोयते घ्यावे लागले. हाती चाबूक घेवून बैलगाडीही हाकणाऱ्या या मुलीला आपल्या शिक्षणावर मात्र, पाणी फेरावे लागले आहे.आत्माराम कदम हे केज तालुक्यातील मांडवखेल येथील रहिवाशी. त्यांना गावामध्ये पाच ते सहा एकर जमीन आहे. परंतु, सर्वच माळरान. पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे शेती पावसाच्या भरवशावरच. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पाऊस होत असल्याने शेती असून नसल्यासारखी. परिणामी आत्माराम कदम यांनी ऊसतोडीचे काम सुरू केले. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून ते दोन मुले आणि एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवितात. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने आत्माराम कदम यांनी केशेगाव येथील साखर कारखान्याची ऊसतोडीची उचल घेतली. आणि आत्माराम व त्यांच्या पत्नी आशाबाई हे दाम्पत्य बैलगाडीसह उसतोडीसाठी केशेगाव परिसरामध्ये दाखल झाले. प्रत्यक्ष ऊसतोडीला सुरूवात केली असतानाच गाडीमध्ये ऊस भरताना ते खाली पडले. सदरील घटनेत त्यांचा उजवा हात मोडल्याने त्याला प्लॅस्टर करावे लागले. पर्यायाने ऊसतोडीचे काम ठप्प झाले. काम बंद राहिल्यास मुकादमाचे पैसे कसे फेडणार? बैलांना कसे जगविणार? असे एक ना अनेक प्रश्न या दाम्पत्यासमोर उभे राहिले. दरम्यान, या घटनेची माहिती कळाल्यानंतर आठवीच्या वर्गामध्ये शिकणारी आत्माराम यांची कन्या दैवशाला ही शाळा सोडून वडीलांच्या मदतीला धावून आली. त्यामुुळे दैवशालाच्या हातातील पेन गळून पडला. शाळेत जावून शिक्षणाचे धडे गिरविण्याऐवजी उसाच्या फडामध्ये उतरून कोयते चालविण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या दैवशाला आणि तिची आई आशाबाई या दोघी मायलेकी न खचता मोठ्या ताकदीने इतर सहकाऱ्यांच्या बरोबरीने ऊसतोडीचे काम करीत आहेत. या संकटामुळे मात्र, दैवशालाच्या शिक्षणाला ‘बे्रक’ लागला आहे. (प्रतिनिधी)४पाच ते सहा एकर जमीन आहे. परंतु, संपूर्ण माळरान. पाण्याची सोय नाही. वर्षागणिक पर्जन्यमानही कमी होवू लागले आहे. त्यामुळे पेरणी केली तरी पिके हाती लागत नाहीत. यंदा तर बरबडाही उगवला नाही. परिणामी मुलांना नातेवाईकांकडे ठेवून कोयते हाती घ्यावे लागले, असे आत्माराम यांच्या पत्नी अशाबाई यांनी सांगितले.४आत्माराम यांना राम आणि शाम ही दोन मुले आहेत. राम हा नववीच्या वर्गात शिकत असून शाम हा दहावीच्या वर्गामध्ये आहे. आईवडील ऊसतोडीसाठी आल्याने यापैकी रामच्या सांभाळ करण्याची जबाबदारी मावशीने घेतली. तर शामची जबाबदारी त्यांच्या गुरूजीने घेतली असल्याचे आत्माराम यांनी सांगितले. मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. तर दैवशाला ऊसतोडीच्या कामामध्ये मदत करू लागत आहे.