शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

५०० शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी करूनही १७७ जणांकडून धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

मूल : शासनाने आधारभूत किंमत जाहीर करून शेतक-यांना बोनस जाहीर केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिततीच्या आधारभूत केंद्रावर गर्दी वाढली. ...

मूल : शासनाने आधारभूत किंमत जाहीर करून शेतक-यांना बोनस जाहीर केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिततीच्या आधारभूत केंद्रावर गर्दी वाढली. ५०० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र आतापर्यंत केवळ १७७ शेतक-यांकडूनच ६५८५.८५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेकडो ताटकळत शेतकरी संदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

शासनाने आधारभूत केंद्रात विक्री करणार्या शेतक-यांना ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धानाची किंमत१८६८ रुपये क्विंटल आहे. शेतक-यांना एका क्विंटलमागे २५६८ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी आधारभूत केंद्रात धान आणण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या आधार केंद्रात ४५८ शेतक-यांनी ५६,७४३.०३ क्विंटल धान विक्रीसाठी आणला होता. मात्र यावर्षी वातावरणातील बदल व रोगराईमुळे धानाची उतारी गतवर्षीपेक्षा कमी आहे. धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रात येत असल्याचे बाजार समितीच्या आवारात वर्दळ आहे बघता दिसुन येते.जवळपास एक हजार शेतकर्याच्या पुढे शेतकरी धान आणण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑनलाइन नोदणी केल्यानंतर संदेश दिला जातो. पण आजही शेकडो शेतकरी प्रतीक्षेत करीत आहेत. मूल शहरात राईसमिलची संख्या बरीच असल्याने येथील तांदुळ मुंबईसह विदेशात निर्यात केली जाते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ४ मार्च २०२० च्या शासन निर्णयानुसार १८६८ रुपये क्विंटल भाव दिला जाणार आहे. त्यात ७०० रुपये बोनस मिळणार आहे. मात्र जे खरोखरच शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. आड मार्गाने धान खरेदी करुन सात बारा नाममात्र जमा करणार्या दलालाला याचा फायदा होऊ नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचा-यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

आधारभूत किंमतीसोबतच ७०० रुपये बोनस जाहीर झाले. त्यामुळे मूल तालुक्यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी केंद्रात धान आणत आहेत. ९५० शेतक-यांनी धान नोंदणीसाठी अर्ज कार्यालयातून नेले. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतक-याचे धान विकत घेण्यात येईल.

-चतुर मोहुले, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल