lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५० टक्के सब्सिडी, दरमहा ३ लाखांपर्यंत होईल कमाई 

२५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५० टक्के सब्सिडी, दरमहा ३ लाखांपर्यंत होईल कमाई 

Business News: सध्याच्या कोरोनाकाळात कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. अशाच एका व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:59 PM2021-06-06T12:59:04+5:302021-06-06T12:59:04+5:30

Business News: सध्याच्या कोरोनाकाळात कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. अशाच एका व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Start this business at Rs 25,000, government will give 50% subsidy, earn up to Rs 3 lakh per month | २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५० टक्के सब्सिडी, दरमहा ३ लाखांपर्यंत होईल कमाई 

२५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५० टक्के सब्सिडी, दरमहा ३ लाखांपर्यंत होईल कमाई 

नवी दिल्ली - कोरोनाकाळात बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा काळात कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. अशाच एका व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला सरकारकडून ५० टक्के घसघशीत सब्सिडीसुद्धा मिळू शकते. हा व्यवसाय आहे मोत्यांच्या शेतीचा. सध्या मोत्यांच्या शेतीचा (Pearl farming) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, हे जाणून घेऊया. (Start this business at Rs 25,000, government will give 50% subsidy, earn up to Rs 3 lakh per month)

मोत्यांची शेती सुरू करण्यासाठी एक तलाव, शिंपले (ज्यामध्ये मोती तयार होतात) आणि ट्रेनिंग या तीन वस्तूंची गरज असते. यासाठी लागणारे तलाव तुम्ही स्वत: खोदू शकता. तसेच यासाठी ५० टक्के सब्सिडी देते त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. सीप भारतातील अनेक राज्यांत सापडतात. मात्र दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील शिंपल्यां दर्जा चांगला असतो. याची ट्रेनिंग भारातातील अनेक संस्थांमधून दिले जाते. मध्य प्रदेशमधील होशंगाबाद आणि मुंबईमधून मोत्यांच्या शेतीचे ट्रेनिंग घेता येऊ शकते. 

सर्वप्रथम शिंपल्यांना एका जाळ्यात बांधून १० ते १५ दिवसांसाठी तलावात ठेवले जाते. त्यामुळे ते तिथे त्यांच्या सोईनुसार वातावरणनिर्मिती करतात. त्यानंतर हे शिंपले बाहेर काढून त्यांच्यावर सर्जरी केली जाते. सर्जरीदरम्यान शिंपल्यामध्ये एक पार्टिकल किंवा साचा टाकला जातो. या साच्यावरील कोटिंगनंतर सिंपले लेअर तयार करतात त्याचेच पुढे मोत्यामध्ये रूपांतर होते.  

एक शिंपला तयार होण्यामध्ये २५ ते ३५ रुपये खर्च होतो. तर तयार झाल्यानंतर एका शिंपल्यामधून दोन मोती बाहेर येतात. यातील एक मोती हा किमान १२० रुपयांना विकला जातो. जर मोत्याचा दर्जा चांगला असेल तर २०० रुपयांहून अधिक किंमत मिळू शकते. जर तुम्ही एक एकरच्या तलावात २५ हजार शिंपले टाकले तर त्यासाठी तुम्हाला आठ लाख रुपये खर्च करावे लागलीत. समजा यातील काही शिंपले खराब झाले तरी ५० टक्क्यांहून अधिक शिंपले सुरक्षित बाहेर काढता येतात. यामधून वर्षाला ३० लाखांपर्यंतची कमाई सहजपणे होते.  

Web Title: Start this business at Rs 25,000, government will give 50% subsidy, earn up to Rs 3 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.