Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा...

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा...

State Bank of India : 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही केवायसी (KYC) केले नाही, तर काय होईल? याबाबतही एसबीआयने माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:50 PM2021-07-19T17:50:27+5:302021-07-19T18:10:33+5:30

State Bank of India : 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही केवायसी (KYC) केले नाही, तर काय होईल? याबाबतही एसबीआयने माहिती दिली आहे.

sbi customers do this work by 30 september otherwise your account will be closed | SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा...

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा...

Highlightsबँकेने म्हटले आहे की, जर आधार आणि पॅन लिंक केले नाही, तर पॅन क्रमांक निष्क्रिय होईल.पॅनकार्ड आधार कार्डसह जोडणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याचे या नोटिसमध्ये म्हटले आहे.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना एक नोटीस पाठविली आहे. बँकेने खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत लवकरात लवकर पॅन-आधार कार्ड (PAN-Aadhaar card) लिंक करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही हे काम ठरलेल्या मुदतीत केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवेत अडथळा येऊ शकतो, असेही बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेने यासंदर्भात आपल्या official website वर माहिती दिली आहे. (sbi customers do this work by 30 september otherwise your account will be closed)

याचबरोबर, बँकेने म्हटले आहे की, जर आधार आणि पॅन लिंक केले नाही, तर पॅन क्रमांक निष्क्रिय होईल. या कारणास्तव ग्राहकांना त्यांचे खाते सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आधार आणि पॅन लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. पॅनकार्ड आधार कार्डसह जोडणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याचे या नोटिसमध्ये म्हटले आहे. यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.

एसबीआय बँक खाते होईल निलंबित
30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही केवायसी (KYC) केले नाही, तर काय होईल? याबाबतही एसबीआयने माहिती दिली आहे. केवायसीशिवाय तुमचे बँक खाते निलंबित केले तर तुमच्या खात्यात जमा केलेले पैसे गोठवले जातील. तुम्ही ते पैसे काढू शकणार नाही. तसेच, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अनुदानही मिळणार नाही.


एसबीआयने म्हटले आहे की, जर तुमचे पॅन आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असतील तर तुम्हाला पुन्हा आधार आणि पॅन बँकेत पाठविण्याची गरज नाही. पॅन आणि आधार जोडण्यासाठी सरकारने जुलै 2017 मध्ये प्रथमच अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली.

दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये पॅन असणे अनिवार्य आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल, डिमॅट खाते उघडायचे असेल, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा पैशाशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर तुमच्याकडे पॅन असणे गरजेचे आहे.

पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया
1) तुमच्याकडे पॅन आणि आधार कार्ड जोडण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला एसएमएसद्वारे आणि दुसरा आयकर वेबसाईटवर भेट देऊन करू शकता.
2) जर तुम्हाला एसएमएसद्वारे पॅन आणि आधार जोडायचा असेल तर तुम्हाला UIDPAN <स्पेस> 12 अंकी आधार क्रमांक <स्पेस> 10 अंकी पॅन क्रमांक 567678 किंवा 56161वर एसएमएस करावा लागेल.

Web Title: sbi customers do this work by 30 september otherwise your account will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.