Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 07:09 IST

कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३०% अनुदानदेखील दिले जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उद्योगिनी योजना २०२५ ला आणखी महिलाकेंद्रित केले आहे. या योजनेअंतर्गत, गरीब महिलांना कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३०% अनुदानदेखील दिले जात आहे. जर एखाद्या महिलेने ३ लाखांचे कर्ज घेतले तर तिला सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. 

या योजनेद्वारे महिला ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स, किराणा दुकाने, दुग्धव्यवसाय किंवा इतर लघु उद्योग असे स्वतःचे छोटे व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात.

कोणाला लाभ घेता येणार?

महिलेचे वय १८ ते ५५ वर्षाच्या दरम्यान असावे आणि तिने मागील कोणतेही कर्ज थकवलेले नसावे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १,५०,००० पेक्षा कमी असले पाहिजे. अपंग आणि विधवांसाठी उत्पन्न मर्यादा नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Women in India to Get Collateral-Free Loans Up to ₹3 Lakh

Web Summary : The central government's Udyogini Yojana 2025 offers collateral-free loans up to ₹3 lakh to empower women entrepreneurs. A 30% subsidy is also available. Women can start businesses like beauty parlors, tailoring shops, or dairy farms. Eligibility: Age 18-55, no prior loan defaults, and family income below ₹1,50,000 (no income limit for disabled and widows).
टॅग्स :महिलाकेंद्र सरकारपैसाबँक