अकोला : जिल्ातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असतानादेखील केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती अकोला शहरासह संपूर्ण जिल्ात कायम असून, जिल्हा परिषद व महापालिकेचा जलप्रदाय विभाग अपयशी ठरला आहे. अशावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याच्या मुद्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यामध्ये मजीप्रा, जिल्हा परिषद तसेच मनपातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना ८४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेद्वारे मजीप्राकडून पाणीपुरवठा केला जातो. मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर येथे चक्क नळाला मीटर बसविण्यात आले आहेत. २००७ पर्यंत अकोला शहराला महान येथून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे होती. एकूणच, आजरोजी धरणांमध्ये उपलब्ध जलसाठा असतानादेखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिस्थिती लक्षात घेता, अकोला शहरासह संपूर्ण जिल्ातील पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. याअनुषंगाने शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत, शुक्रवारी संबंधित अधिकार्यांसोबत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शासनाने ५० टक्के अनुदान दिल्यास मनपाची योजना राबवण्यास तयार असल्याचे मत मजीप्राच्या अधिकार्यांनी व्यक्त केले.
अकोला जिल्ाचा पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Updated: May 24, 2014 20:44 IST