पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी
By admin | Updated: May 8, 2014 20:15 IST
विजेचा लपंडाव : दोन वृक्ष कोसळले
पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी
विजेचा लपंडाव : दोन वृक्ष कोसळलेपंचवटी : बुधवारी सायंकाळच्या सुमाराला वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय झाले होते. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरीकांची त्रेधा उडाली तर उकाडयापासून काही काळ सुटका मिळाली. पावसामुळे पंचवटीतील हिरावाडी तसेच कृष्णनगर परिसरात दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली पावसामुळे परिसरातील हिरावाडीरोड, मालेगाव स्टॅँन्ड परिसर, दिंडोरीरोड आदिंसह खोलमय भागात पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाला सुरूवात झाली आणि विज पुरवठा खंडीत व्हायला सुरूवात झाली होती. सायंकाळी परिसरातील काही भागात जवळपास सात ते आठ वेळा विज पुरवठा खंडीत झाल्याने सायंकाळी नागरीकांची अडचण निर्माण झाली तर हिरावाडीरोडवर रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार नागरीकांनी केली. वादळी वार्यामुळे हिरावाडी तसेच कृष्णनगर परिसरात असलेले दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन वृक्षाच्या फांदा बाजू काढण्याचे काम केले. रात्री उशिरापावेतो पावसाची सततधार सुरू असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला होता. सायंकाळच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने कामाहून घराकडे परतणार्या नागरीकांना पावसात भिजतच मार्गक्रमण करावे लागल्याचे चित्र दिसुन आले. (वार्ताहर)