नवी दिल्ली : उद्योगक्षेत्रत सुधारणांच्या संकेतामुळे उत्साहित भारतीय कंपन्यांनी येत्या तीन महिन्यांत कर्मचा:यांची मेगा भरती करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे भारतातील बेरोजगारांसाठी हे शुभवर्तमान म्हणता येईल.
मॅनपॉवर एम्प्लॉयमेंट आऊटलूक सव्रेक्षणानुसार, स्थिर सरकार स्थापन झाल्याने उद्योगक्षेत्र झपाटय़ाने वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ब:याच क्षेत्रत कर्मचारी नियुक्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे. सव्रेक्षणानुसार 5,389 नियुक्तीदात्यांनी जुलै ते सप्टेंबरदरम्यान आक्रमकरीत्या कर्मचारी भरतीची योजना आखली आहे. मागील वर्षातील या काळाच्या तुलनेत तीन महिन्यांत नियुक्त्यांमध्ये 46 टक्के वाढ अपेक्षित आहे. अहवालात म्हटले आहे की, जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून भारत, तैवान, तुर्की, न्यूझीलंड आणि सिंगापूर येथे कुशल कर्मचारी नियुक्तीकरिता अधिक प्राधान्य दिले आहे, तर इटली, बेल्जिअम, फ्रान्स आणि नेदरलँड येथे कर्मचारी भरतीसाठी पोषक वातावरण नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बँक ऑफ इंडिया करणार 4,5क्क् कर्मचा:यांची भरती
जयपूर : 2क्14-15 या आर्थिक वर्षात बँक ऑफ इंडिया 4,5क्क् नवी कर्मचा:यांची भरती करणार आहे. यापैकी 2,क्क्क् पदे अधिकारी श्रेणीतील, तर उर्वरित 2,5क्क् पदे लिपिक व अन्य कर्मचारी श्रेणीतील आहेत. 31 मार्चर्पयत बँकेची एकूण उलाढाल 8 लाख 53 हजार कोटी रुपयांची झाली, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. आर. अय्यर यांनी दिली. ते म्हणाले की, सध्या बँकेच्या एकूण 4,628 शाखा असून यात आणखी 5क्क् शाखांची भर पडणार आहे. यासाठी मनुष्यबळाचीही आवश्यकता असेल. बँकेच्या एटीएमची संख्या 4,665वरून 8क्क्क् करण्यात येईल, असेही ते म्हणाले.