#खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:02 AM2018-02-19T02:02:48+5:302018-02-19T02:02:57+5:30

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

# Khamgaon Krishi Mahotsav: Farmers fall in love with modern farming technology! | #खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

#खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

googlenewsNext
ठळक मुद्देविविध स्टॉलवर बघण्यासाठी जिल्हय़ातील ग्रामीण भागातून झाली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 
कृषी महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक कल दिसून आला.  या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली बी रहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर ऊर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत. संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकर्‍यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्‍चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळय़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्‍यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी या ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.  कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता,  कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती या ठिकाणी शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. 
 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Farmers fall in love with modern farming technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.