गोष्ट त्या रात्रीची, ज्यामुळे ब्रेकअप झाले होतं सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 09:00 PM2020-03-29T21:00:00+5:302020-03-29T21:00:00+5:30

सलमान खान व ऐश्वर्या राय यांचे अफेयर खूप चर्चेत आले होते.

The thing that happened that night was the breakup of Salman Khan and Aishwarya Rai Tjl | गोष्ट त्या रात्रीची, ज्यामुळे ब्रेकअप झाले होतं सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं 

गोष्ट त्या रात्रीची, ज्यामुळे ब्रेकअप झाले होतं सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं 

googlenewsNext

साल 1999. रुपेरी पडद्यावर झळकला होता हम दिल दे चुके सनम. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्या राय ही जोडी होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप भावली होती. हिंदी चित्रपटांचे चाहते तेव्हा खूश झाले जेव्हा त्यांना समजले की दोघेही खऱ्या जीवनात एकमेकांना डेट करत आहेत. सलमान व ऐश्वर्याची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी बनली होती. मात्र काही कालावधीनंतर त्या दोघांच्या नात्यात इतकी कटूता आली की ते दोघे आता एकमेकांचं नाव घेणेदेखील टाळतात.

बॉलिवूडचे हे कपल जवळपास तीन वर्षे एकत्र होते. 2002 साली त्यांच्या नात्यात कटूता आली जेव्हा ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला. सलमानने कधीच हे आरोप मान्य केले नाही. मात्र तो रागीट असल्यामुळे त्याच्यावर सगळीकडून खूप टीका झाली.

असं सांगितलं जातं की ऐश्वर्या व सलमान खान यांच्या नात्यात कडवटपणा 2001 सालापासून यायला सुरूवात झाली होती. तो नोव्हेंबरचा महिना होता जेव्हा उशीरा रात्री सलमान ऐश्वर्याच्या अपार्टमेंट बाहेर हायव्हॉल्टेज ड्रामा करताना दिसला होता. तिथे असलेल्या लोकांनी सांगितले की सलमान खूप रागात होता आणि ऐश्वर्याचा दरवाजा वाजवत होता. ऐश्वर्या दरवाजा खोलत नव्हती. त्यावेळी सलमानला हेदेखील बोलताना ऐकले होते की जर दरवाजा नाही उघडला तर तो सुसाइड करेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा संपूर्ण घटनाक्रम रात्री 3 पर्यंत सुरू होता. दरवाजा वाजवून वाजवून सलमानच्या हातातून रक्त वाहू लागले होते. दोन ते तीन तास चालू असलेल्या ड्राम्यानंतर ऐश्वर्याने तीन वाजता दरवाजा उघडला आणि सलमान घरात गेला. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात कटुता येण्यामागचे कारण लग्न होते. सलमानची इच्छा होती की ऐश्वर्याने लग्नासाठी कमिटमेंट द्यावे. पण ऐश्वर्या त्यासाठी तयार नव्हती.

सलमान व ऐश्वर्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की ऐश्वर्या तेव्हा लग्नासाठी तयार नव्हती आणि सलमानला हे पटत नव्हते. त्यात सलमान त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. त्यावेळी त्याने याबद्दल ऐश्वर्याला सांगितले नव्हते.

सोमीला भेटून आल्यानंतर सलमान जेव्हा अमेरिकेतून परतला तेव्हा ऐश्वर्या खूप रागात होती. त्यावेळी तिने ब्रेकअप करायचे सांगितले. हेच निमित्त झालं आणि ते दोघे वेगळे झाले. अखेर त्यांचं 2002 साली ब्रेकअप झाले. मात्र याआधी नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या सलमानच्या किस्स्याने जगाला गॉसिप दिले.

 

Web Title: The thing that happened that night was the breakup of Salman Khan and Aishwarya Rai Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.