म्हणून ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसह केले लग्न, हा सिनेमा ठरला यासाठी निमित्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:33 PM2020-04-27T14:33:54+5:302020-04-27T14:39:25+5:30

अभिषेक बच्चनने सांगितले की,मी न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि, आपण एक दिवस ऐश्वर्यासोबत लग्न करून एकत्र राहिलो तर किती छान होईल याचा विचार करत होतो.”

For this Reason Aishwarya got married to Abhishek Bachchan-SRJ | म्हणून ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसह केले लग्न, हा सिनेमा ठरला यासाठी निमित्त !

म्हणून ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसह केले लग्न, हा सिनेमा ठरला यासाठी निमित्त !

googlenewsNext

आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. मात्र बॉलिवूडमधील काही  कलाकार जेव्हा ऐशबरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहत होते. तेव्हा मात्र ज्युनिअर बच्चन ऐश्वर्याच्या हृदयाचा ताबा मिळवला होता.

तो तिच्या प्रेमात आकंठ बुडला होता. विशेष म्हणजे अभिषेकने ऐश्वर्याला नकली हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अभिषेकने तिला गुरूच्या शूटिंगदरम्यान शूटिंग करते वेळी वापरली जाणारी हिऱ्याची रिंग देऊन प्रपोज केला होता. ही वास्तविक हिर्‍याची अंगठी नव्हती.अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, “मी न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि, आपण एक दिवस ऐश्वर्यासोबत लग्न करून एकत्र राहिलो तर किती छान होईल याचा विचार करत होतो.” 

ऐश्वर्यानेही त्यांची लव्हस्टोरी कशी बहरत गेली याविषयी सांगतले, अभिषेक त्याच्या नात्यात खरा आणि अस्सल असतो. त्याने मला ज्या मार्गाने प्रपोज केले ते अचानक, अत्यंत भयानक होते. नक्कीच आम्ही मौल्यवान हिऱ्याची अंगठी खरेदी करू शकतो. पण आम्हाला त्याची गरज आहे का? जरी गुरू सिनेमा धीरूभाई अंबानी यांच्यावर असला तरी, या सिनेमानेच या दोन तार्‍यांना जवळ आणले.

ऐश-अभिषेकची भेट 1997 ला ‘प्यार हो गया’ या सिनेमादरम्यान झाली होती. या सिनेमात ऐश-अभिषेकचा चांगला मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता.अभिषेकने नंतर ऐश्वर्याबरोबर ‘ढाई अक्षर प्रेम के’ (2000) आणि ‘कुछ ना कहो’ (2003) मध्ये काम केले. पण गुरु हा सिनेमापासूनच हे दोघे जास्त जवळ आले.


2006 ते 2007 दरम्यान उमराव जान, गुरू, धूम 2 च्या शूटिंगदरम्यान या जोडप्याला एकमेकांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि दोघांमध्ये प्रेम वाढलं. आणि पुढे प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं.  आज या दोघांना आराध्या नावाची गोंडस मुलगी आहे. ऐश्वर्या वैवाहिक जीवनात खूप सुखी असून तिचे आईपण देखील एन्जॉय करत आहे.

Web Title: For this Reason Aishwarya got married to Abhishek Bachchan-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.