नेमकं काय बिनसलं की रणबीर कपूर व कतरिना कैफला वेगळं व्हावं लागलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:40 PM2021-03-22T13:40:55+5:302021-03-22T13:42:34+5:30

रणबीर व कतरिनाचं का झालं ब्रेकअप? वाचा पडद्यामागची ब्रेकअप स्टोरी 

real reason behind ranbir kapoor and katrina kaif breakup | नेमकं काय बिनसलं की रणबीर कपूर व कतरिना कैफला वेगळं व्हावं लागलं?

नेमकं काय बिनसलं की रणबीर कपूर व कतरिना कैफला वेगळं व्हावं लागलं?

googlenewsNext
ठळक मुद्देब्रेकअपनंतर आयुष्यात आता काहीच उरलेले नाही, असे मला वाटतेय, असे कतरिना म्हणाली होती.  

कतरिना कैफ ही रणबीर कपूरचा भूतकाळ आहे तर आलिया भट हा  वर्तमान. प्ले बॉय म्हणून ओळखल्या जाणा-या रणबीर कपूरचे नाव अनेकींशी जोडले गेले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची. ऐकून आश्चर्य वाटेल पण रणबीर व कॅट दोघेही सहा वर्षे नात्यात होते. मग असे काय झाले की, या नात्याचा ‘दी एंड’ झाला. आज आम्ही तुम्हाला यामागचे नेमके कारण सांगणार आहोत.

2009 साली ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या सिनेमाच्या सेटवर रणबीर व कतरिनाची प्रेम कहाणी सुरू झाली होती. अर्थात सुरुवातीला फक्त मैत्री होती. पण ही मैत्री प्रेमात कधी बदलली, हे दोघांनाही कळले नाही. ‘राजनीती’च्या सेटवर ही प्रेमकहाणी चांगलीच बहरली. कारण याच सिनेमानंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. पुढे दोघांच्या व्हॅकेशनचे बोल्ड फोटो व्हायरल झालेत आणि या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. इतकेच नाही तर यानंतर काहीच दिवसांत हे जोडप लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्याही बातम्या आल्यात. मग बिनसले कुठे?

 असे म्हणतात की, रणबीर व कतरिना एकमेकांप्रती खूप गंभीर होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण एका व्यक्तिचा या नात्याला प्रचंड विरोध होता. याच विरोधामुळे कॅट व रणबीरचे ब्रेकअप झाले. ही व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती व्यक्ती होती रणबीर कपूरची आई नीतू सिंग.  नीतू यांना कतरिना जराही पसंत नव्हती. याचमुळे दोघांचे ब्रेकअप झाले.
या ब्रेकअपनंतर कतरिना सैरभैर झाली होती. एका मुलाखतीत ती यावर बोलली होती.


 
‘कुणीही असू द्या,जे काही घडले त्याबद्दल माझ्या मनात अजिबात राग वा द्वेष नाही.   प्रत्येकजण स्वत: साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा काहीतरी चांगलं देण्याच्या नादात आपण स्वत:चे नुकसान करुन बसतो. त्यामुळेच मला मित्रांपेक्षा शत्रूंवर जास्त विश्वास आहे.   ब्रेकअप या जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट आहे. ब्रेकअपनंतर आयुष्यात आता काहीच उरलेले नाही, असे मला वाटतेय, असे कतरिना म्हणाली होती.  
 अर्थात आता कतरिनानेही जुनं सगळं मागे सोडत मुव्ह ऑन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिच्या व विकी कौशलच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. रणबीर कपूरच्या आलियाबद्दल तर तुम्हाला ठाऊक आहेच.

Web Title: real reason behind ranbir kapoor and katrina kaif breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.