धर्मेंद्रच्या प्रेमात हरवून गेली होती मीना कुमारी, वाचा का अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:34 PM2020-12-08T12:34:49+5:302020-12-08T12:42:43+5:30

पंजाबचे गबरू जवान धर्मेंद्र यांनी फिल्मफेअरचं टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकलं होतं. पण तरी त्यांना सिनेमे मिळत नव्हते. घरची परिस्थिती गरिबीची होती.

Know the untold love story of Dharmendra and Meena Kumari | धर्मेंद्रच्या प्रेमात हरवून गेली होती मीना कुमारी, वाचा का अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी....

धर्मेंद्रच्या प्रेमात हरवून गेली होती मीना कुमारी, वाचा का अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी....

googlenewsNext

अभिनेते धर्मेद्र यांना बॉलिवूडचा 'ही मॅन' म्हटलं जातं. आपल्या काळातील ते सर्वात यशस्वी रोमॅंटिक आणि अॅक्शन हिरो होते. पण त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यांना करिअरच्या सुरूवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यांचं करिअर रूळावर आणण्यासाठी अभिनेत्री मीना कुमारी समोर आल्या होत्या. चला जाणून घेऊ त्यांच्या प्रेम कहाणीबाबत जी पूर्ण होऊ शकली नाही.

पंजाबचे गबरू जवान धर्मेंद्र यांनी फिल्मफेअरचं टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकलं होतं. पण तरी त्यांना सिनेमे मिळत नव्हते. घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे त्यांना गॅरेजमध्ये रहावं लागलं होतं. हळूहळू त्यांना साइड हिरोच्या भूमिका मिळू लागल्या होत्या. पण मोठा ब्रेक मिळ नव्हता.

राजकुमार उडवत होते खिल्ली

सर्वांनाच माहीत आहे की राजकुमार किती स्पष्टवक्ते होते. ते बॉलिवूडमधील कुणाचीही खिल्ली उडवत होते. राजकुमार त्या काळातील मोठे कलाकार होते तर धर्मेंद्र त्यावेळी धडपडत होते. असे म्हणतात की, राजकुमार धर्मेंद्र यांना हिरोच्या लायकीचंच मानत नव्हते. ते म्हणायचे हा पंबाजी मुलगा हिरोसारखा नाही तर फुटबॉलच्या खेळाडूसारखा दिसत होता.

मीना कुमारी यांनी दिला आधार

मीना कुमारी त्यावेळच्या अशा पर्सनॅलिटीच्या अभिनेत्री होत्या की, त्यांना बघून कुणीही हरवत होतं. असे म्हणतात की, मीना कुमारी यांना बघून राजकुमार सुद्धा डायलॉग विसरत होते. 'काजल' राजकुमार मीना कुमारीचे हिरो होते आणि धर्मेंद्रने मीना कुमारीच्या भावाची भूमिका केली होती. पण धर्मेंद्रवर मीना कुमारींचं पूर्ण लक्ष 'फूल और पत्थर' सिनेमादरम्यान गेलं.

मीना कुमारींचं त्यांचे पती कमाल अमरोहीसोबतचं नातं खराब झालं होतं. पण तरी त्यांना धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांची जवळीकता अजिबात पसंत नव्हती. जर कमाल अमरोही नसते तर कदाचित मीना कुमारी यांच्या सर्वात चांगल्या सिनेमापैकी एक 'पाकिजा'मध्ये त्यांचे हिरो राजकुमार नाही तर धर्मेंद्र असते.

मीना कुमारी यांनी शिकवले बॉलिवूडचे नियम

बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र गावातून आलेले एक साधे-सरळ तरूण होते. तेव्हा सुपरस्टार मीना कुमारी यांनी त्यांना इंडस्ट्रीत जगण्याचे, चालण्या-बोलण्याचे आणि काम करण्याचे नियम शिकवले होते. असे म्हणतात की, मीना कुमार धर्मेंद्र यांच्या प्रेमात हरवून गेल्या होत्या. मीना कुमार धर्मेंद्र यांच्याबाबत खूप पझेसिव्ह होत्या की, त्या अनेकदा धर्मेंद्र यांना ओरडायच्या.

शेवटच्या दिवसात मीना कुमारींपासून दूर झाले होते धर्मेंद्र

हळूहळू धर्मेंद्र यांनी फिल्म इंडस्ट्रीत आपले पाय रोवले. आणि त्यांचा मीना कुमारी यांच्यातील इंटरेस्ट कमी झाला होता. हळूहळू ते मीना कुमारीपासून दूर होऊ लागले होते. तर मीना कुमारींचं त्यांच्यावर आधीसारखंच प्रेम होतं. असे सांगितले जाते की, यानंतर मीना कुमारी यांना स्वत:ला पूर्णपणे दारूच्या हवाली सोडलं होतं.

असे सांगितले जाते की, मीना कुमार धर्मेंद्र यांना वेड्यासारखं प्रेम करायच्या. धर्मेंद्र त्यांचं हे पझेसिव्हनेस पेलू शकले नाहीत. असे म्हणतात की, की, एकदा धर्मेद्र यांनी मीना कुमारी यांना झापड मारली होती. यात किती तथ्य आहे हे तर माहीत नाही पण इतकं नक्की की, आजही बॉलिवूडच्या गल्ल्यांमध्ये धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची चर्चा होते.
 

Web Title: Know the untold love story of Dharmendra and Meena Kumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.