ऋषी आणि नितू कपूर यांच्या लग्नात या कारणामुळे थांबण्यात आले होते विधी, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:58 PM2020-01-23T12:58:31+5:302020-01-23T13:00:43+5:30

ऋषी कपूर आणि नितू सिंग कपूर यांच्या प्रेमकथेइतकाच त्यांच्या लग्नातील एक किस्सा देखील प्रसिद्ध आहे.

'I fainted at my wedding and so did my husband' - Neetu Singh | ऋषी आणि नितू कपूर यांच्या लग्नात या कारणामुळे थांबण्यात आले होते विधी, कारण ऐकून बसेल धक्का

ऋषी आणि नितू कपूर यांच्या लग्नात या कारणामुळे थांबण्यात आले होते विधी, कारण ऐकून बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देनितू यांनी सांगितले होते की, मी आणि ऋषी दोघेही आमच्या लग्नात बेशुद्ध पडलो होते. पण दोघांचेही बेशुद्ध पडण्याचे कारण वेगवेगळे होते.

ऋषी कपूर आणि नितू सिंग कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. ऋषी आणि नीतू दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते दोघे एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांच्या लग्नाला कालच 40 वर्षं झाली असून त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी, पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळते. 

ऋषी कपूर आणि नितू सिंग कपूर यांच्या प्रेमकथेइतकाच त्यांच्या लग्नातील एक किस्सा देखील प्रसिद्ध आहे. ऋषी कपूर आणि नितू सिंग कपूर यांनी पाच वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. 1980 साली झालेल्या या लग्नाची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. नितू आणि ऋषी यांच्या नात्याला सुरुवात झाली. त्यावेळी नितू केवळ 14 वर्षांच्या होत्या. नितू इंडस्ट्रीत अगदी नवीन असल्याने नितू यांना सतत चिडवत असत. ही ऋषी यांची गोष्ट नितू यांना अजिबात आवडायची नाही. पण त्याचदरम्यान त्या दोघांची मैत्री झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. खेल खेल में या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली.

ऋषी आणि नितू यांच्या अफेअरबाबत काहीच दिवसांत कपूर कुटुंबियांना कळले. त्यावर राज कपूर यांनी त्यांना लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. तुम्हाला माहीत आहे का, लग्नात ऋषी आणि नितू दोघेही बेशुद्ध पडले होते. नितू यांनीच या किस्साविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. नितू यांनी सांगितले होते की, मी आणि ऋषी दोघेही आमच्या लग्नात बेशुद्ध पडलो होते. पण दोघांचेही बेशुद्ध पडण्याचे कारण वेगवेगळे होते. माझ्या लेहंगाच्या वजनामुळे मी बेशुद्ध पडले होते तर ऋषीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी जमा झाल्याने तो बेशुद्ध पडला होता. या सगळ्यामुळे आमच्या लग्नाचे विधी काही काळापर्यंत थांबवण्यात आले होते. आमच्या दोघांची तब्येत चांगली झाल्यानंतरच आमचे लग्न लावण्यात आले. 


 

Web Title: 'I fainted at my wedding and so did my husband' - Neetu Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.