Birthday Special : ‘या’ भीतीमुळे संजीव कुमार यांनी केले नाही लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 12:13 PM2019-07-09T12:13:12+5:302019-07-09T12:14:08+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार संजीव कुमार आज आपल्यात नाहीत. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Birthday Special : sanjeev kumar did not marry because of this superstition | Birthday Special : ‘या’ भीतीमुळे संजीव कुमार यांनी केले नाही लग्न!!

Birthday Special : ‘या’ भीतीमुळे संजीव कुमार यांनी केले नाही लग्न!!

googlenewsNext
ठळक मुद्देवयाच्या २० व्या वर्षी त्यांनी एका वृद्धाची भूमिका साकारली होती. त्यांना त्या भूमिकेत पाहून पृथ्वीराज कपूर दंग झाले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार संजीव कुमार आज आपल्यात नाहीत. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संजीव कुमार आठवण्याचे कारण म्हणजे, १९३८ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांचा जन्म झाला होता.

संजीव कुमार यांचे खरे नाव हरीभाई जरीवाला होते. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. ‘कोशिश’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मूक व कर्ण बधिर व्यक्तीची भूमिकाही गाजली होती.

संजीव कुमार अनेकदा प्रेमात पडले. पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. लग्न न करण्यामागे एक खास कारण होते. होय, एक मोठी अंधश्रद्धा. त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा दहा वर्षांचा झाला की, त्याच्या वडिलांचा मृत्यू होत असे. संजीव कुमार यांच्या वडिलांसोबत आणि भावासोबत हेच घडले होते. त्यांच्या अन्य कुटुंबीयांसोबतही असेच घडले होते. त्यामुळे संजीव कुमार यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. पण हा दत्तक पुत्र १० वर्षांचा होताच, संजीव कुमार यांचाही मृत्यू झाला.

ज्या महिलांसोबत संजीव यांचे अफेअर राहिले, त्या सर्वांवर त्यांचा कधीच पूर्ण विश्वास नव्हता. त्या सगळ्या माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करतात, असेच त्यांना वाटायचे. याचमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही़. त्यांना एक भीती कायम छळायची. ती म्हणजे, मृत्यूची़  कारण त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सगळे पुरूष पन्नाशीच्या आत जग सोडून गेलेत. संजीव कुमार यांच्या लहान भावानेही खूप लहान वयात जगाला अलविदा म्हटले. त्यामुळे मृत्यूची भीती संजीव यांच्या मनात घर करून बसली होती. मी लवकर जाणार, असे ते आपल्या जवळच्यांना नेहमी म्हणत आणि कदाचित झालेही असेच. वयाच्या ४७ व्या वर्षी ते सर्वांना सोडून गेलेत.

संजीव कुमार यांनी अनेक लहान भूमिकाही केल्यात. कुठलीही भूमिका स्वीकारताना ते घाबरले नाहीत. त्याचमुळे कधीकाळी जया बच्चन यांच्या प्रियकराची, पतीची भूमिका साकारणा-या संजीव कुमार यांनी पुढे जया यांच्या सास-यांची आणि वडिलांचीही भूमिका साकारली.  ‘त्रिशूल’ या चित्रपटात संजीव कुमार यांना अमिताभ व शशी कपूर या समकालीन अभिनेत्यांच्या पित्याची भूमिका ऑफर झाली. संजीव कुमार यांनी तीही स्वीकारली.  वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी एका वृद्धाची भूमिका साकारली होती. त्यांना त्या भूमिकेत पाहून पृथ्वीराज कपूर दंग झाले होते.

Web Title: Birthday Special : sanjeev kumar did not marry because of this superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.