अमिताभ बच्चन यांनी जया यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले आहे असे... वाचा काय आहे हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:02+5:30

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात स्पर्धकाशी गप्पा मारताना अमिताभ यांनी एक सिक्रेट गोष्ट सगळ्यांना सांगितली.

Amitabh Bachchan Has Saved Wife Jaya Bachchan’s Phone Number Under THIS Name On His Mobile | अमिताभ बच्चन यांनी जया यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले आहे असे... वाचा काय आहे हे नाव

अमिताभ बच्चन यांनी जया यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले आहे असे... वाचा काय आहे हे नाव

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ म्हणाले मी, माझ्या पत्नीच्या नावाचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच जया बच्चनचा शॉर्ट फॉर्म जेबी असे जयाचे नाव सेव्ह केले आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनप्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते. या कार्यक्रमात अमिताभ उपस्थित स्पर्धकांसोबत दिलखुलास गप्पा मारतात. या कार्यक्रमात सुमित तडियाल नावाचा स्पर्धक आला होता. त्याच्याशी गप्पा मारताना अमिताभ यांनी एक सिक्रेट गोष्ट सगळ्यांना सांगितली.



अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सुमीतशी गप्पा मारताना त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारले. त्यावर त्याने माझे लव्ह मॅरेज असले तरी आम्ही आमच्या कुटुंबियांना ते अरेंज मॅरेज असल्यासारखे दाखवले होते असे सांगितले. तसेच माझी बायको मला सुनिये अशीच हाक मारते. त्यामुळे मी माझ्या मोबाईलवर देखील सुनिये असेच तिचे नाव सेव्ह केले आहे असे सांगितले. त्यावर अमिताभ यांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांचे नाव मोबाईलमध्ये कशाप्रकारे सेव्ह केले आहे हे सांगितले. ते म्हणाले मी, माझ्या पत्नीच्या नावाचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच जया बच्चनचा शॉर्ट फॉर्म जेबी असे जयाचे नाव सेव्ह केले आहे.



बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. पुरस्कार सोहळा असो किंवा पार्टी ते दोघे एकत्र पहायला मिळतात. ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या गुड्डी चित्रपटासाठी आधी जया यांच्या सोबत अमिताभ यांना घेतले होते. पण नंतर बिग बींना या चित्रपटातून काढण्यात आले. सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ लोक सांगतात की, या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्यासाठी जया यांच्या मनात प्रेम आणि सहानुभूती निर्माण झाली. त्या दोघांची ओळख याच सेटवर झाली होती.



त्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना जंजीर या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या दरम्यान त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना एकत्र सुट्टी व्यतित करण्यासाठी परदेशात जायचे होते. पण, त्यावेळी हरिवंशराय बच्चन यांनी जर जयासोबत सुट्टी एन्जॉय करायची असेल तर तिच्यासोबत लग्न करावे लागेल अशी अट घातली आणि त्याचमुळे त्या दोघांनी केवळ काहीच लोकांच्या उपस्थित लगेचच लग्न केले. 

Web Title: Amitabh Bachchan Has Saved Wife Jaya Bachchan’s Phone Number Under THIS Name On His Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.