अजय देवगणने २३ वर्षांनंतर केला खुलासा, काजोलशी का केलं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:06 PM2022-04-27T15:06:33+5:302022-04-27T15:31:56+5:30

अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल  (Kajol)  हे बॉलिवूडमधील पावर कपल पैकी एक आहे.

Ajay Devgn reveals after 23 years, why did he marry Kajol | अजय देवगणने २३ वर्षांनंतर केला खुलासा, काजोलशी का केलं लग्न?

अजय देवगणने २३ वर्षांनंतर केला खुलासा, काजोलशी का केलं लग्न?

googlenewsNext

अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल  (Kajol)  हे बॉलिवूडमधील पावर कपल पैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला 23 वर्षे झाली असतील. एका टॉक शोमध्ये अजयला विचारण्यात आले की त्याने काजोलशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? त्यामुळे यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने जे काही सांगितले ते खूपच मजेदार आहे.

सुपरस्टार अजय देवगण त्याच्या आगामी 'रनवे 34' (Runway 34)चित्रपटामुळे चर्चेत आहे. २९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अजय खूप व्यग्र आहे. तो या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

दरम्यान, जेव्हा तो एका टॉक शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने काजोलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर त्याने उत्तर दिले की ते खूप आणि प्रपोज न करता एकमेकांना आवडू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संवादादरम्यान अजय देवगणने कबूल केले की इतरांप्रमाणेच त्यानेही आपल्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, परंतु त्या समस्यांना मागे टाकून तो एकत्र काम करायला शिकला आहे. 

अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर. पहिल्या भेटीत काजोलला वाटलं होतं की अजय फार घमंडी आहे. पण नंतर तिचा भ्रम दूर झाला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.  

अजय देवगण आणि काजोलच्या प्रेमकथेची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नव्हते पण दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचे दोघांनाही ठाऊक होते. बॉलीवूडमध्ये अशी लव्हस्टोरी दुसरी कोणाचीही नसेल. 

Web Title: Ajay Devgn reveals after 23 years, why did he marry Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.