सलमानच्या रागीट स्वभावामुळे नाहीतर ऐश्वर्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिमूळे झाले दोघांचे ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 01:09 PM2021-02-09T13:09:14+5:302021-02-09T13:15:22+5:30

'हम दिल दे चुके सनम'मध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय.

Aishwarya Rai Bachchan's father Krishnaraj Rai the reason behind her breakup with Salman Khan | सलमानच्या रागीट स्वभावामुळे नाहीतर ऐश्वर्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिमूळे झाले दोघांचे ब्रेकअप

सलमानच्या रागीट स्वभावामुळे नाहीतर ऐश्वर्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिमूळे झाले दोघांचे ब्रेकअप

googlenewsNext

''कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. ''या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान आणि ऐश्वर्याबाबत.

'हम दिल दे चुके सनम'मध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही. मात्र 2001 साली दोघांच्या प्रेमकहाणीत आलं मोठं वादळ. सलमान खाननं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं ऐश्वर्याचं कथित विधान एका इंग्रजी दैनिकानं छापलं.  

 

त्यानंतर दोघांच्याही नात्यात कायमचा दुरावा आला असे म्हटले जाते. नेहमीच दोघांच्या ब्रेकअपसाठी सलमानचा रागीट स्वभाव कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. पण असे नसून सत्य काही दुसरेच आहे. ऐश्वर्याच्या वडिलांना  प्रेमाविषयी  समजले तेव्हाच त्यांनी ऐश्वर्याला सलमानपासून दूर राहण्याचे सांगितले होते. या दोघांचे प्रेम ऐश्वर्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. वडिलांचे म्हणणे ऐश्वर्याही टाळु शकत नव्हती. वडिलांच्या सांगण्यावरुनच ऐश्वर्या सलमानपासून दूर झाली आणि दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते.

सलमानसह ब्रेकअप झाल्यानंतर त्याच दरम्यान 'क्यों हो गया ना' सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयमध्ये जवळीक वाढत असल्याच्याही वावड्या उठल्या... त्यामुळंच विवेक आणि सलमानमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. शेवटी सलमान असो किंवा विवेक कुणीही ऐश्वर्याच्या मनाचा राजा होऊ शकलं नाही.

 

तर दुसरीकडे त्याचवेळी ज्युनियर बीनं मात्र  ऐशचं मन जिंकलं. लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळलेल्या असतात हेच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या  नात्यावरुन समोर आले होते. कारण करिश्माशी लग्न मोडल्यानंतर अभिषेकचं विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायसह लग्न झालं. दोघांचा सुखी संसार सुरु आहे.
 

Read in English

Web Title: Aishwarya Rai Bachchan's father Krishnaraj Rai the reason behind her breakup with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.