ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:55 PM2020-05-11T12:55:40+5:302020-05-11T12:56:58+5:30

अमिताभ ऐश्वर्याला त्यांच्या सुनेप्रमाणे नव्हे तर मुलीप्रमाणेच वागवतात. पण एका कारणामुळे चक्क ऐश्वर्या त्यांच्यावर रागवली आहे.

Is Aishwarya Rai Bachchan upset with Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi? PSC | ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण

ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात देखील झाली आहे. याच चित्रपटावरून ऐश्वर्याला अमिताभ यांचा राग आला होता.

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांना अनेक समारंभात एकत्र पाहिले जाते. त्या दोघांमध्ये खूपच छान नातं असल्याचे म्हटले जाते. अमिताभ ऐश्वर्याला त्यांच्या सुनेप्रमाणे नव्हे तर मुलीप्रमाणेच वागवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ऐश्वर्याला अमिताभ यांचा काही महिन्यांपूर्वी चांगलाच राग आला होता आणि हे कारण काही घरगुती नव्हते. अमिताभ यांनी एका नायकासोबत चित्रपट स्वीकारल्याचे ऐश्वर्याला अजिबातच आवडले नव्हते.  

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला  काही महिन्यांपूर्वी सुरुवात देखील झाली आहे. याच चित्रपटावरून ऐश्वर्याला अमिताभ यांचा राग आला असल्याचे वृत्त त्यावेळी पिंकव्हिला या वेबसाईटने दिले होते. 

पिंकव्हिलाने त्यांच्या वृत्तात म्हटले होते की, चेहरे या चित्रपटाद्वारे अमिताभ आणि इमरान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटात एकमेकांसोबत काम करण्यास ते दोघे प्रचंड उत्सुक आहेत. पण इमरानसोबत काम करण्याचा अमिताभ यांचा निर्णय ऐश्वर्याला आवडलेला नाहीये. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात इमरानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो महेश भट्ट यांच्यासोबत झळकला होता. या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये दिलेल्या एका उत्तरामुळे ऐश्वर्याला इमरानचा राग आला होता. त्याने एका प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्याला प्लास्टिक म्हटले होते. ही कमेंट ऐश्वर्याला रुचली नव्हती. तिने कॉफी विथ करणच्या या भागानंतर दिलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुझ्याबद्दल ऐकलेली कोणती कमेंटच्या तुझ्या अद्याप लक्षात आहे त्यावर तिने फेक आणि प्लास्टिक असे उत्तर दिले होते. तेव्हापासूनच तिचे इमरानबद्दलचे मत चांगले नव्हते आणि त्याचमुळे अमिताभ यांनी इमरानसोबत काम करण्यास होकार दिल्याचे ऐश्वर्याला पटलेले नव्हते.

'चेहरे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये निर्माते आनंद पंडित, अभिनेता इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन दिसत होते. या फोटोसोबत त्यांनी म्हटले होते की, 'बऱ्याच कालावधीपासूनची एक कमिटमेंट आज पूर्ण झाली.'

Web Title: Is Aishwarya Rai Bachchan upset with Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi? PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.