प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:52 PM2019-09-30T16:52:04+5:302019-09-30T16:55:30+5:30

प्रियंकाचे गेल्यावर्षी निक जोनाससोबत लग्न झाले. प्रियंका आता लग्नानंतर सगळ्यात जास्त काय मिस करतेय हे तिने या कार्यक्रमात कपिलशी गप्पा मारताना सांगितले आहे

“After marriage, I miss eating Gol-gappas in the US”, Priyanka Chopra said in the kapil sharma show | प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियंकाने कपिलला सांगितले की, मी माझ्या लग्नानंतर पाणीपुरी खाणे मिस करते. कारण युएसमध्ये मला पाणीपुरी खायला मिळत नाही. त्यावर कपिलने पाणीपुरीची गाडीच कार्यक्रमाच्या सेटवर मागवली

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर हजेरी लावणार आहेत. ते दोघे कपिलच्या टीमसोबत खूप सारी मजा मस्ती करण्यासोबतच आपले अनेक सिक्रेट्स देखील सांगणार आहेत. त्यांचा स्काय इज पिंक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचे ते प्रमोशन करताना दिसणार आहेत.

प्रियंका चोप्रा सध्या भारतात असून ती तिच्या स्काय इज पिंक या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर, जायरा वसीम, रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रियंकाचे गेल्यावर्षी निक जोनाससोबत लग्न झाले. प्रियंका आता लग्नानंतर सगळ्यात जास्त काय मिस करतेय हे तिने या कार्यक्रमात कपिलशी गप्पा मारताना सांगितले आहे. तिने कपिलला सांगितले की, मी माझ्या लग्नानंतर पाणीपुरी खाणे मिस करते. कारण युएसमध्ये मला पाणीपुरी खायला मिळत नाही. त्यावर कपिलने पाणीपुरीची गाडीच कार्यक्रमाच्या सेटवर मागवली आणि प्रियंका, फरहान, कपिल आणि अर्चना पुरणसिंग यांनी पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारला. पाणीपुरी खाताना प्रियंकाने पाणीपुरी देणाऱ्याला हाक मारली आणि भैय्या, मला पण पाणीपुरी द्या असे ती म्हणाली, त्यावर पाणीपुरी विकणारे सगळेच भैय्या नसतात असे म्हणत फरहानने तिची टर उडवली. 

प्रियंकाने या कार्यक्रमात आणखी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. प्रियंकाला मिरची प्रचंड आवडत असल्याने तिला मिठ्ठू असे म्हटले जाते असे तिने सांगितले. तिचे हे नाव तिच्या आत्याने ठेवले असल्याचे सांगत ती म्हणाली, मी केवळ मिरचीच खात नाही तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची मिमिक्री देखील करते, त्याचमुळे मला मिठ्ठू हे नाव माझ्या आत्याने ठेवले आहे. 

Web Title: “After marriage, I miss eating Gol-gappas in the US”, Priyanka Chopra said in the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.