अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! बॉलिवूडमधील या सहा कपल्सची लव्हस्टोरी राहिली अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 09:00 PM2020-02-16T21:00:00+5:302020-02-16T21:00:00+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप छान होती. 

This 6 bollywood couples love story not completed | अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! बॉलिवूडमधील या सहा कपल्सची लव्हस्टोरी राहिली अपूर्ण

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! बॉलिवूडमधील या सहा कपल्सची लव्हस्टोरी राहिली अपूर्ण

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये आपण बरीच लव्हस्टोरी व ब्रेकअपच्या कथा ऐकत असतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप छान होती. त्यांच्या चाहत्यांनादेखील त्यांनी एक व्हावे असे वाटत होते. मात्र त्यांचे हे नातं अपूर्ण राहिले. या जोड्यांमध्ये अमिताभ बच्चन-रेखा, राज कपूर-नरगीस, गुरू दत्त-वहिदा रहमान यांंसारख्या कपल्सचा समावेश आहे. 

गुरू दत्त - वहिदा रहमान


गुरू दत्त आणि वहिदा रहमान यांची लव्हस्टोरी खूप ट्रॅजिक आहे. गैरसमजामुळे त्याच्या नात्याचा शेवट झाला. दोघंही एकमेकांसाठी वेडे होते. मात्र त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि नात्याचा शेवट झाला.

राज कपूर - नरगिस 


राज कपूर आणि नरगिस यांनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी सुंदर होती तेवढीच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चांगली होती. दोघांचं प्रेम खऱ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकलं नाही. याचं कारण म्हणजे राज कपूर विवाहित होते. यानंतर मदर इंडिया चित्रपटावेळी नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं. सिनेमात नरगिसनं सुनीलच्या आईची भूमिका साकारली होती ही गोष्ट वेगळी.

अमिताभ बच्चन- रेखा 


बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची जोडी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु आता मात्र ते एकत्र काम करताना दिसणं अशक्य आहे. कारण आता दोघांचे मार्ग वेगळे आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्यातील प्रेमाची सुरूवात सिलसिला सिनेमापासूनच झाली होती. मात्र अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं आणि रेखा यांच्यासोबतचे नाते अपूर्ण राहिले.

संजय दत्त- माधुरी दीक्षित- 


एक असा काळ होता जेव्हा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. मात्र संजय दत्तची पर्सनल लाईफ या नात्यात आडवी आली. संजय दत्तचे आधी लग्न झालेले होते त्याला एक मुलगीही होती. त्यामुळे माधुरीने लग्नासाठी कधी होकार दिला नाही आणि दोघांची प्रेमकहाणी अधुरी राहिली.

सनी देओल- डिंपल कपाडिया- 


सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांची लव्हस्टोरी निराळी होती. दोघांची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन खूप हिट होती. परंतु सनी देओल विवाहित असल्याने हे नाते अपूर्ण राहिले.

सलमान खान-ऐश्वर्या राय बच्चन


सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सुपरहिट होती. त्या दोघांच्या लव्हस्टोरी आजही चर्चेत येत असते. संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या वेळी सलमान आणि ऐश्वर्या यांच्यामधील जवळीकता वाढली. परंतु हे नातं जास्त काळ टिकलं नाही. ऐश्वर्यानं त्याच्यावर आरोप केले होते की तो दारू पिऊन तिच्यासोबत गैरवर्तण करतो. तिनं सांगितलं होतं तो हातही उचलतो. यानंतर विवेक ऑबेरॉयनं पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर गोष्टी अजून बिघडल्या होत्या. नंतर दोघांमधील दुरावा वाढत गेला. ऐश्वर्या राय बच्चनने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि आता तिला एक मुलगीदेखील आहे. 
 

Web Title: This 6 bollywood couples love story not completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.