‘त्या’ १५ गावातील पाण्याचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:44+5:30

विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहे

The water problem in 'those' 15 villages is unresolved | ‘त्या’ १५ गावातील पाण्याचा प्रश्न अधांतरी

‘त्या’ १५ गावातील पाण्याचा प्रश्न अधांतरी

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांवर दुबार संकट : बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : उन्हाची तीव्र दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला तालुक्यातील विहरी तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद पडले आहेत. विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहे
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठण ठणात आहे त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे
लॉकडाऊनमुळे मजुराअभावी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी होतांना शेतकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदने उन्हाळी हंगामात ऊस व धानपिक शेतात लावले परंतु विहारी तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल. या विवंचनेत शेतकरी सापडला आहे दरम्यान आ राजू कारेमोरे यांच्या कडे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली असता कारेमोरे यांनी जिल्हाधिकारी यांना बावनथडी प्रकल्पाचे नदीत पाणी सोडण्यासंदर्भात ६ मे रोजी पत्र दिले आहे मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पिकांना फटका
निर्सगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्री चा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात मात्र उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे. त्यावर शेती फिडरच्या भारनियमन मुळे शेतकऱ्यांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे कोविड -१९ कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी देशाला लॉक डाऊन करण्यात आल्याने सर्व जागच्या जागी थांबले आहे.

Web Title: The water problem in 'those' 15 villages is unresolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.