Anant Chaturdashi 2021 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुसहस्त्रनाम म्हणा आणि असंख्य लाभ मिळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:21 PM2021-09-17T13:21:52+5:302021-09-17T13:22:36+5:30

Anant Chaturdashi 2021 : ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते.

Anant Chaturdashi 2021: Say Vishnu Sahasranama on the day of Anant Chaturdashi and get innumerable benefits! | Anant Chaturdashi 2021 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुसहस्त्रनाम म्हणा आणि असंख्य लाभ मिळवा!

Anant Chaturdashi 2021 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुसहस्त्रनाम म्हणा आणि असंख्य लाभ मिळवा!

googlenewsNext

Anant Chaturdashi 2021 : महाभारतात श्रीकृष्णाने अनंताचे व्रत युधिष्ठिरास सांगितले होते!

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

विष्णुसहस्रनामाचा महाभारतातील उल्लेख : 

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?

त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. 

व्रत, कुळाचार, पूजा किंवा अन्य धार्मिक कार्यात उणीव राहिल्यास पाप लागते का? शास्त्र सांगते...
 
महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

जगद्गुरु शंकराचार्यदेखील या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात,

>> भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा.

>> भगवंताचे चिंतन करा.

>> सत्संग करा. 

>> दीनजनांना दान करा. 

विष्णुसहस्रनामाचे फायदे : 

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

Web Title: Anant Chaturdashi 2021: Say Vishnu Sahasranama on the day of Anant Chaturdashi and get innumerable benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.