अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:29 PM2020-09-16T17:29:03+5:302020-09-16T17:40:13+5:30

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल

Finally, flights from Aurangabad to Mumbai from September 22 | अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

googlenewsNext
ठळक मुद्देएअर इंडिया करणार सेवेला सुरुवात  आठवड्यातून ३ दिवस उड्डाण 

औरंगाबाद : औरंगाबादकरांचीमुंबई विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडियाकडून २२ सप्टेंबरपासून मुंबई- औरंगाबाद - मुंबई विमानसेवा सुरू केली जात आहे. आठवड्यातून ३ दिवस हे विमान उड्डाण घेईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली. 

 

आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेईल. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेऊन औरंगाबादेत  सायंकाळी ७.२० वाजता दाखल होईल. रात्री ८.२० वाजता येथून उड्डाण घेईल  आणि रात्री ९.३५ वाजता विमान मुंबईत पोहोचेल.

प्रवाशांना दिलासा 
मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळाला नाही. किमान सायंकाळचे स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली, ही मागणी मान्य झाली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल, अशी आशा आहे.
- सुनीत कोठारी, उद्योजक 

Web Title: Finally, flights from Aurangabad to Mumbai from September 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.