सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 12:20 PM2021-12-04T12:20:22+5:302021-12-04T12:24:28+5:30

Farmer Couple Suicide in Aurangabad : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे पत्नीने विहिरीत, तर पतीने झाडाला घेतला गळफास

Due to constant barrenness, the farmer couple commits suicide in Aurangabad | सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला

सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला

googlenewsNext

पिंपळदरी (औरंगाबाद ) : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीतील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी घडली. पत्नीने विहिरीत उडी घेऊन, तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली ( farmer couple commits suicide). सदानंद गुलाबराव गव्हाणे (वय ३९), ज्योती सदानंद गव्हाणे (३२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सततच्या नापिकीला कंटाळून या दाम्पत्याने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात असून आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.

पिंपळदरीतील ३२ वर्षीय ज्योती गव्हाणे यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही मिनिटांतच ज्योती यांचा पती सदानंद गव्हाणे यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. परिसरातील नागरिकांनी सदानंद यांना खाली उतरवून उपचारासाठी सिल्लोडला नेले; परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत केले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, उपनिरीक्षक कैलास पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम पठाण, भागीनाथ शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून ज्योती गव्हाणे यांना काढून पती सदानंद गव्हाणेसह शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. सततच्या नापिकीला कंटाळूनच गव्हाणे दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे. आत्महत्या करणाऱ्या या दाम्पत्यास १३ वर्षीय सदानंद आणि १० वर्षीय वैष्णवी नावाची मुलगी आहे.

अल्पभूधारक शेतकरी
सदानंद गव्हाणे हे अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या काही वर्षांपासून शेतीमधून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने ते हैराण होेते. परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याने नापिकीला कंटाळून या दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती पुढे येत आहे. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पिंपळदरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Due to constant barrenness, the farmer couple commits suicide in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.