३२ जणांनी केली ३०० कि.मी. सायकल राइड
By | Published: December 6, 2020 04:04 AM2020-12-06T04:04:53+5:302020-12-06T04:04:53+5:30
या सायकल राइडला क्रांती चौक येथून ६ वाजता सुरुवात झाली. या सायकल राइडचा मार्ग क्रांती चौक ते मांजरसुभा आणि ...
या सायकल राइडला क्रांती चौक येथून ६ वाजता सुरुवात झाली. या सायकल राइडचा मार्ग क्रांती चौक ते मांजरसुभा आणि त्याच परतीच्या मार्गाने होता. नियमानुसार मांजरसुंभा येथे दुपारी ४ वाजेआधी व औरंगाबाद येथे रात्री २ वाजता पोहोचणे आवश्यक होते. त्यात ३२ सायकलपटू यशस्वी ठरले. यशस्वी सायकलपटूला प्रमाणपत्र व मेडल प्रदान केले जाते.
३०० कि.मी. यशस्वी सायकल राइड करणारे सायकलपटू पुढीलप्रमाणे : संभाजी पाटील, जसमित सिंह वाधवा, मुस्तफा टोपीवाला, सई देशमुख, अतुल जोशी, जयेश त्रिभुवन, सचिन कासलीवाल जैन, अजय पाटील, सागर तोलवानी, नगरवाला झवारे, मनीष खंडेलवाल, शरद काळे पाटील, चांगदेव माने, हरिश्चंद्र मात्रे, अमोघ जैन, सोनम शर्मा, कविता जाधव, बाबासाहेब सूर्यवंशी, पाराजी जाधव, विजय विभुते, सुधीर कुलकर्णी, बालाजी नरगुडे, विजय पतोडी, निखिल कचेश्वर, निखिल मिसाळ, शरद गोयल, विक्रम घुडे, संतोष कुलकर्णी, राजकुमार मालानी, भूषण कपाडिया, शैलेश कोरान्ने, आनंद राजहंस.
आयर्नमॅन नितीन घोरपडे व अभिजित नारगोलकर यांनी या सायकल राइडचे आयोजन केले होते.