मुख्यालयी न राहणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:13 AM2021-01-23T04:13:42+5:302021-01-23T04:13:42+5:30
पान ३ साठी धारणी : मेळघाटात पर्यटनाला चालना द्यावी व रोजगार निर्माण करावा, यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय प्रशासकीय कामे ...
पान ३ साठी
धारणी : मेळघाटात पर्यटनाला चालना द्यावी व रोजगार निर्माण करावा, यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय प्रशासकीय कामे प्रत्येक शासकीय यंत्रणांनी जाणीवपूर्वक करावी, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे दिले. धारणी उपविभागीय कार्यालयात गुरुवारी बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार राजकुमार पटेल, चिखलदरा पंचायत समितीचे सभापती जामूनकर, धारणी पंचायत समितीच्या सभापती सुलोचना जांभेकर, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक जेब, यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मेळघाटात नोकरी करीत असलेले अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. जे कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाहीत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. मेळघाटातील रिक्त पदे भरण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.