संत रविदास महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:59+5:302021-03-01T04:21:59+5:30
------------------------- भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात! कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...
-------------------------
भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात!
कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ
दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. भाजीपाला विक्री केली जात नसल्याने गुरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. शिवारात पाण्याची सुविधा असल्याने शेतकरी बारामाही भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. गत वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला, तसेच निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामातही शेतकऱ्यांचा लागवडी खर्च वसूल झाला नाही. त्यानंतर, अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू झाल्यानंतर जनजीवन रुळावर येत होते. मात्र, गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पैशांची जुळवाजुळव एकरी ५०,००० हजार रुपये खर्च करून टोमॅटो, वांगी, मिरची व इतर भाजीपाला पिकाची पेरणी केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाल्याची विक्री कुठे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिणामी, शेतकरी गुरांना भाजीपाला टाकीत असल्याचे चित्र आहे.
-----------------------------------------------------
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत टोमॅटो ५० रुपये कॅरेटने विक्री होत आहे, तसेच आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्री कुठे करावी, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत.
विलास बाबाराव खवले, शेतकरी, दानापूर