शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:59 PM2019-12-16T14:59:38+5:302019-12-16T14:59:42+5:30

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.

Farmers' waiver implemented on paper! | शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

Next

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला; मात्र शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.
यासोबतच शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची सवलतही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. जिल्हाधिकाºयांनी आदेश देण्यास महिनाभराचा कालावधी होत असला तरी, शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याच्या कार्यवाहीचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

किती शेतकºयांचा; किती शेतसारा माफ?

शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे; परंतु शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश गत महिन्यात जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आला आहे; मात्र किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात अहवाल प्राप्त झाले नाहीत. याबाबतचे अहवाल तातडीने तहसीलदारांकडून मागविण्यात येतील.
-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Web Title: Farmers' waiver implemented on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.