सरकारमध्ये शेतकऱ्यांची मुले हवीत- सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:12 AM2020-01-13T03:12:48+5:302020-01-13T03:13:06+5:30

खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कार प्रदान; मान्यवरांची उपस्थिती

Farmers should have children in government - Sachin Pilot | सरकारमध्ये शेतकऱ्यांची मुले हवीत- सचिन पायलट

सरकारमध्ये शेतकऱ्यांची मुले हवीत- सचिन पायलट

Next

संगमनेर (जि. अहमदनगर): देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतकऱ्यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी पायलट बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात,ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार आहे. या सरकारने प्रथम शेतकºयांची कर्जमाफी करुन ऐतिहासिक निर्णय घेतला. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार (एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह) राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार (एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह) पर्यावरणामध्ये काम कारणारे डॉ. गिरीश गांधी यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना (स्मृती चिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम) प्रदान करण्यात आला.

Web Title: Farmers should have children in government - Sachin Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.