शिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:18 PM2020-09-30T12:18:55+5:302020-09-30T12:19:35+5:30

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Anil Bhaiya's words are final in Shiv Sena; The two will get a chance | शिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी

शिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी

Next

अहमदनगर:  महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावे सुचविण्याचा आज (३० सप्टेंबर) अखेरचा दिवस आहे. शिवसेनेकडून मदन आढाव संग्राम शेळके या दोघांची नावे यापूर्वी झालेल्या बैठकीतच  सुचविण्यात आली होती. दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव विक्रम यांना संधी द्यावी अशी पक्षातून मागणी पुढे आली होती. 

याबाबत स्थानिक पदाधिका-यांनी विक्रम राठोड यांच्याशी चर्चाही केली. परंतु वडिलांनी मदन आढाव यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे हा शब्द पक्षाने कायम ठेवावा. आढाव यांना संधी द्यावी, अशी भूमिका विक्रम राठोड यांनी मांडली असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

स्व. अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  अशावेळी अनेक इच्छुकांनी डोके वर काढले होते. मात्र विक्रम राठोड यांनी मनाचा मोठेपणा दाखवत वडिलांचा शब्द मोठा असून कार्यकर्त्यांनीही या शब्दाचा आदर ठेवून या दोघांना संधी देण्यास संमती दिल्याची माहिती आहे.

Web Title: Anil Bhaiya's words are final in Shiv Sena; The two will get a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.