शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

श्रीगोंद्याच्या राजकारणाला उकळी

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

श्रीगोंदा : भाजपाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो, कार्यकर्त्यांची इच्छा हेच माझे तिकीट आहे.

श्रीगोंदा : भाजपाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो, कार्यकर्त्यांची इच्छा हेच माझे तिकीट आहे. कुकडी, घोड, साकळाई, सीना, वीज, रस्ते, रोजगार हे प्रश्न घेऊन विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरणार आहे, अशी घोषणा कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी केली.कुकडी साखर कारखाना कार्यस्थळावर सभापती मीना देवीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जगताप समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जगताप बोलत होते. मान्यवरांची भाषणेयावेळी अशोक कार्ले, सिद्धेश्वर देशमुख, मीना देवीकर, संजय जामदार, अ‍ॅड.सुभाष डांगे, शामराव नागवडे, गौतम घोडके, विलासराव दिवटे, दत्ता शिर्के, सुभाष गायकवाड, दादा औटी, भैय्या वाबळे, हनुमंत झिटे, सुभाष कांबळे, सुभाष काळोखे, रभाजी कातोरे, अ‍ॅड.निवृत्ती वाखारे यांचीही भाषणे झाली. सुखेदव तिखोले यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (तालुका प्रतिनिधी)राहुल समाजासाठी दिलामागील विधानसभा निवडणुकीत ‘आता तुम्ही आमचे काम करा, पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमचे काम करू’ असा शब्द नागवडे यांनी दिला होता. आता त्यांनी शब्द पाळावा. मला आमदारकीच्या निवडणुकीने तीन वेळा हुलकावणी दिली. माझे आमदारकीचे स्वप्न अपुरे आहे. आता राहुल समाजासाठी दिला आहे. तो समाजाबरोबर आणि समाजाने त्याच्याबरोबर राहावे. मी फक्त आशीर्वाद देण्याची भूमिका करणार आहे, असे भावनिक उद्गार कुकडी साखर कारखान्याने संस्थापक कुंडलिक जगताप यांनी काढले. धनगर समाजाची बैठकमेळाव्यानंतर राहुल जगताप यांच्या उमेदवारीला समर्थन देण्यासाठी धनगर समाजाची बैठक झाली. बैठकीस नाना पडवळकर, शेंडगे, आप्पा धायगुडे, सुखदेव तिखोले आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या मनगटात दम नाहीलोकसभा निवडणुकीत ज्यांना मदत केली ते तिकीट देण्याचा शब्द पाळतील, असा विश्वास आहे. आता तिकिटासाठी वेळ घालविणार नाही. १२ जुलैपासून मतदार संघाचा दौरा करणार असून यावेळी जनतेचे प्रश्न समजावून घेणार आहे. कुकडीचे पाणी पुणेकरांनी पळविले की, लोकप्रतिनिधींच्या मनगटात दम नाही म्हणून पाणी मिळत नाही, हा प्रश्न आहे. तालुक्यात सध्या वीजप्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या भावाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मग त्यांनी आमदारकी, मंत्रीपदाची सत्ता कुणासाठी वापरली ? असा सवाल राहुल जगताप यांनी केला.