Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान; पुन्हा थंडीचा कडाका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:35 IST

गेल्या आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीने २९ नोव्हेंबरला रात्री जोरदार पुनरागमन केले आहे. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे.

अहिल्यानगर : गेल्या आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीने २९ नोव्हेंबरला रात्री जोरदार पुनरागमन केले आहे. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे.

सोमवारी तापमानाचा पारा थेट ९.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. सोमवारी नोंदले गेलेले तापमान राज्यातील नीचांकी तापमान होते.

गत आठवड्यात तापमान वाढल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात उकाडादेखील वाढला होता. पण आता पुन्हा थंडीचा कडाका सुरू झाला आहे.

१२ ते १४ अंशांवर असलेले तापमान अचानकपणे ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

थंडीमुळे रात्री उशिरापर्यंत चालणारी वर्दळही कमी झाली आहे. सकाळी फिरायला येणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून आले. सायंकाळनंतर बाजारातही शुकशुकाट दिसला.

अधिक वाचा: Bajari Market : थंडी वाढताच 'बाजरी'च्या मार्केटमध्ये भरभराट; वाचा राज्यात कसा मिळतोय दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Cold wave returns: Lowest temperature recorded in this Maharashtra district.

Web Summary : After a week's absence, cold weather has strongly returned to Ahilyanagar. The temperature plummeted to 9.4 degrees Celsius, the state's lowest. This sudden drop has reduced night activity and morning walkers, leaving markets deserted in the evenings.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानअहिल्यानगरमहाराष्ट्र