कथा नही, जीवन की व्यथा सुनाने आया हूं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:22 PM2018-09-01T23:22:27+5:302018-09-01T23:23:03+5:30

समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली.

No story, I have come to say life's misery ... | कथा नही, जीवन की व्यथा सुनाने आया हूं...

कथा नही, जीवन की व्यथा सुनाने आया हूं...

Next
ठळक मुद्देसंस्मरणीय संदेश : यवतमाळकरांच्या मनात ठसले मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे ‘कडवे वचन’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मै कथा नही,
जीवन की व्यथा सुनाने आया हूं...
अर्थी उठाने से पहले,
जीवन का अर्थ समझ लेना
वर्ना बडा अनर्थ हो जायेगा...
समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. ९ वर्षांपूर्वी यवतमाळात मुनिश्रींचा पदस्पर्श झाला होता. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांचे ‘कडवे वचन’ कानात प्राण आणून ऐकले आणि काळजात जपून ठेवले. त्यांच्या निर्वाणाचे वृत्त ऐकून अनेकांच्या मनात पोरकेपणा दाटला.
२००९ हे ते वर्ष होते. जेव्हा क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागरजी महाराज पहिल्यांदाच यवतमाळनगरीत आले होते. श्रीमती वीणादेवी जवाहरलालजी दर्डा परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने मुनिश्रीजींच्या ‘कडवे प्रवचन’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनासाठी श्वेतांबर, दिगंबर, मंदिर मार्गी, जैन समाजातील इतर सर्व पंथांनी एकत्र येऊन श्री सकल जैन समाज यवतमाळची स्थापना केली होती. सकल जैन समाजाच्या छत्राखाली हे आयोजन केले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने एकत्रित जैन समुदाय इतिहास घडवू शकतो, हे अपार गर्दीच्या आयोजनातील शिस्तबद्धता आणि भव्यदिव्यतेने सिद्ध केले. विशेष म्हणजे, एकत्रित जैन समाज इतर सर्व समाजाला सोबत घेऊन मोठ्यात मोठे आयोजन नक्कीच करू शकतो व ही काळाची गरज आहे, याबाबत मुनिश्रीजींनीही मार्गदर्शन केले होते.
७ ते १२ एप्रिलपर्यंत चाललेली ही प्रवचनमाला अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली होती.
जीवन भी एक क्रिकेट है
सृष्टी के महान स्टेडियम मे
धरती के विराट पिचपर
समय बॉलिंग कर रहा हैं
शरीर बल्लेबाज हैं
परमात्मा के इस आयोजन मे
अंपायर धर्मराज हैं
प्राण हमारा विकेट हैं
जीवन भी एक क्रिकेट हैं
अशा काव्यात्मक शैलीत मुनिश्रीजींनी यवतमाळकरांचे हृदय जिंकले होते. जनसामान्यांना समजणाऱ्या सुगम भाषेत त्यांनी जीवनाचा गर्भित सार मांडला होता. ‘सासों के सीमित ओव्हर मे सर्जन के रन बनाने हैं’ हा त्यांचा संदेश अनेकांचे मतपरिवर्तन घडवून गेला. अशा या क्रांतिकारी राष्ट्रसंतांच्या निधनाने यवतमाळकर हळवे झाले आहेत.

मुनिश्री म्हणाले होते, ‘ऐतिहासिक’ आयोजन
आयोजन आयोजन समितीचे अध्यक्ष तत्कालीन खासदार विजय दर्डा, कार्याध्यक्ष किशोर दर्डा, स्वगताध्यक्ष अरुणभाई पोबारू, महामंत्री सुभाष जैन, उपाध्यक्ष महेंद्र सुराणा, प्रकाश चोपडा, मोहन गांधी, नरेश लुणावत, अशोक जैन, राजेंद्र गांधी, राजू जैन, विनोद छेडा, लहरभाई नागडा, सुभाषचंद आचलिया, नंदकुमार बदनोरे, चंद्रकांत देसाई, सचिव प्रवीण बोरा, विजय लुणावत, खंतीबाई दोशी, परेश लाठीवाला, समन्वय सचिव प्रसन्न दफ्तरी, डॉ. शेखर बंड, डॉ. रमेश खिंवसरा, नंदकुमार इंगोले यांच्यासह अनेकांनी आयोजनासाठी दररोज बैठका घेतल्या. प्रत्येक कामाचे काटेकोर नियोजन केले जात होते. खुद्द मुनिश्री तरुणसागरजी महाराजांनीही यवतमाळच्या प्रवचनमालेचा ‘ऐतिहासिक’ असा उल्लेख केला होता, हे विशेष.

Web Title: No story, I have come to say life's misery ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.