Next

मोदींनी मौन सोडले; पाच राज्यांमधील भाजपाच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 12:17 PM2019-01-02T12:17:23+5:302019-01-02T12:19:08+5:30

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर ...

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवासाठी १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सीही (सरकारविरोधी लाट) कारणीभूत असल्याचं सांगतानाच, आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करून पुढची आखणी करत असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. या पराभवांमुळे पक्षाचं मनोधैर्य अजिबात खच्ची झालं नाही आणि २०१९ मध्ये जनता आम्हालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.