Next

Indian Air Strike on Pakistan: जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 11:25 AM2019-02-26T11:25:28+5:302019-02-26T11:28:28+5:30

मुंबई -  भारताने पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानमधील  बहुतांशी दहशतवादी तळ ...

मुंबई -  भारताने पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानमधील  बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  भारतीय  सैन्याने आपली ताकद दाखवली. जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी वायुसेनेचं कौतुक केलं आहे.