पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:34 PM2019-06-25T18:34:07+5:302019-06-25T18:34:41+5:30
आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.
खळद : पुरंदर तालुक्याला वळवाच्या मोठ्या पावसाने हुलकावणी दिल्याने व अद्यापही मॉन्सूनचा पाऊस सुरू न झाल्यान येथील शेतकरी हवालदिल झाला असुन खरिपाच्या लागवडी, पेरण्या वेळेवर व्हाव्यात, यासाठी शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
या वर्षी मॉन्सून समाधानकारक होईल, असे हवामान खाते सांगत
आहे; तर मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाने सुरुवातही
केली आहे. परंतु कायमच दुष्काळी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्याला मात्र अजूनही पावसाने हुलकावणीच दिली आहे.
८ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. त्याचे वाहन कोल्हा हे असून या नक्षत्रात पावसाचे प्रमाण चांगले सांगितले आहे.
खरीप हंगामावरच येथील शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. फुलशेती, भाजीपाला, कांदा, प्रसिद्ध वाटाणा, बाजरी यांचे क्षेत्र येथे मोठ्या प्रमाणावर असते. त्यातून चार पैसेही मिळतात. त्यामुळे हाच हंगाम धोक्यात आला, तर मात्र शेतकरी पूर्णपणे कोलमडला जाईल, अशी स्थिती असते. यामुळे खरिपाचे काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)