मालेगावातील ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली लालफितशाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:38 PM2019-05-20T17:38:14+5:302019-05-20T17:44:30+5:30

मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे.

35 crore water supply scheme in Malegaon is stuck | मालेगावातील ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली लालफितशाहीत !

मालेगावातील ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली लालफितशाहीत !

googlenewsNext

- अमोल कल्याणकर
लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे. शहराला अद्याप एकाच जलकुंभातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया चाकातिर्थ प्रकल्पात अल्प जलसाठा असून यापुढे १० दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मालेगाव ग्राम पंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होऊन तीन वर्षांंचा कालावधी उलटला आहे. शहराची लोकसंख्या वाढली असून, त्या तुलनेत शहरातील भौतिक व मुलभूत सुविधांत मात्र फारशी सुधारणा झाली नाही. दरवर्षी उन्हाळ्यात शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकट असते. यावर्षीदेखील शहरवासी पाणीटंचाईला सामोेरे जात आहेत. शहराला गेल्या २५ वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यासाठी एकच जलकुंभ असून, या जलकुंभातून एकाच वेळी संपूर्ण शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पातही कमी जलसाठा असतो. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी अपुºया पावसामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. त्यावेळी चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा प्रकल्पापर्यंत पाणी आणून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरती योजना सुरू करण्यात आली. ती योजनाही फारसी उपयुक्त ठरली नाही. प्रत्यक्षात मालेगाव शहराची पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी प्रशासनाने ३५ कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. तथापि, या योजनेचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही. यावर्षीतर पाणीटंचाईने भीषण स्वरुप धारण केले आहे. तालुक्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. चाकातिर्थ प्रकल्पातही पुरेसा प्रमाणात जलसाठा नसल्याने शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. येत्या काही दिवसात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक ठरत आहे. 

मालेगाव शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल तसेच ३५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- रेखा अरूण बळी
नगराध्यक्ष, मालेगाव

Web Title: 35 crore water supply scheme in Malegaon is stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.