नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 10:06 AM2019-02-16T10:06:37+5:302019-02-16T12:17:30+5:30

जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

pulwama attack : Passengers Stop the Railway service from Nalasopara to Virar | नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप

नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप

googlenewsNext

नालासोपारा - जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली  होती. दरम्यान, चार तासांनंतर हे  आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

आज सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वे प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्र्ॅकवर उतरलेल्या नागरिकांकडून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. 



जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350  स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Web Title: pulwama attack : Passengers Stop the Railway service from Nalasopara to Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.