पाणी टंचाई दरू करण्यासाठी आव्हाडांचे पालकमंत्र्यांसह इतर तीनही आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:10 PM2019-06-25T16:10:47+5:302019-06-25T16:14:39+5:30

ठाणे शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शाई धरण मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली आहे. यासाठी पक्षभिनिवेश बाजूला ठेवून काम करुया आणि पाणी टंचाई दूर करुया अशी सादही त्यांनी घातली आहे.

To protect the water scarcity, cover the three other MLAs, including Guardian Minister | पाणी टंचाई दरू करण्यासाठी आव्हाडांचे पालकमंत्र्यांसह इतर तीनही आमदारांना साकडे

पाणी टंचाई दरू करण्यासाठी आव्हाडांचे पालकमंत्र्यांसह इतर तीनही आमदारांना साकडे

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरण महत्वाचेशिवसेनेच्या तीनही आमदारांनी घातली साद

ठाणे - ठाण्यातील वाढती पाणी टंचाई लक्षात भविष्यात पाण्याचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षभिनिवेश बाजूला सारुन ठाण्यासाठी मंजुर झालेले शाई धरण मार्गी लावूया अशी सार्थ हाक राष्ट्रवादीचे कळवा- मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील इतर तीनही आमदारांना घातले आहे. त्यामुळे आता किती आमदार त्यांच्या या हाकेला ओ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
               या संदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर आणि सुभाष भोईर यांना एक पत्र लिहिले असून त्याच्या माध्यमातून ही साद घातली आहे. ठाण्यात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हिरानंदानी मेडोजसारख्या सर्वात महागड्या गृहसंकुलांना सुद्धा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आज घोडबंदरचा पट्टा हा पाण्यावाचून त्रस्त आहे. जी परिस्थिती घोडबंदरला आहे तीच परिस्थिती दिवा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट पाणी कनेक्शन घेऊन दादागिरी करु न काही विभागामध्ये पाणी दिले जाते. परंतु, या सगळ्याचा परिणाम हा पाणी वितरणावर होतो आणि अख्ख्या ठाणेकरांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये पाणी वितरणाबाबत धाडसाने महानगरपालिकेने काम केले असे काहीच दिसत नाही. पण, त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपले स्वतंत्र स्त्रोत्र नसल्यामुळे एम. आय. डी. सी. मध्ये होणारे शटडाऊन आणि स्टेमचा होणारा शटडाऊन यामुळे अनेकवेळा ४-४ दिवस विविध भागांमध्ये पाणी नसल्याचे आढळून आले आहे. खरतर आतापर्यंत आपण आपले स्वत:च स्त्रोत्र म्हणजेच एक धरण उभे करायला हवे होते. पण, दुर्देवाने ते घडू शकले नसल्याची खंतही त्यांनी यात व्यक्त केली आहे. परंतु यामध्ये आता कुठल्या पक्षाला दोष मात्र त्यांनी दिलेला नाही. सध्याची ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज ही परिस्थिती पाहता आणि गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता पावसाळाही हळुहळु पुढे सरकत चालला आहे. पूर्वी जूनच्या ७ तारखेला येणारा पाऊस आता जूलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. उन्हाळा जो पहिला एप्रिल मध्ये सुरु व्हायचा तो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये सुरु होतो. त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला अधिक पाणी तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र धरण असणे फार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि शासनाची मदत घेऊन जे शाई धरण २००३ साली मंजूर केले होते. त्या धरणाबाबत अंतिम भूमिका घेऊन त्याच्या बांधकामाला सुरवात करुया अशी साद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून घातली आहे. राजकारण बाजूला ठेवूयात आणि आपल्या ठाण्याचा पाणी प्रश्न हा कायमचा सोडवूया असे आवाहनही त्यांनी केले आहे.



 

Web Title: To protect the water scarcity, cover the three other MLAs, including Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.