खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:57 AM2018-03-23T00:57:33+5:302018-03-23T00:57:33+5:30

मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे.

 Initiatives of private companies; The severe water scarcity of the villages will be over | खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

Next

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांतील गाळ काढून त्यांची पाणीसाठवण क्षमता वाढवणार आहे. तर, काढलेला गाळ माळरानावर पसरवून गाळयुक्त शिवाराची ११६ कामे खाजगी कंपन्यांद्वारे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
जागतिक जल दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ११६ कामे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हाती घेण्यासाठी छोट्यामोठ्या कंपन्या पुढे आल्याची माहिती उघड झाली. या कार्यक्रमास माजी आ. दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, अधीक्षक अभियंता बा.भा. लोहार, सहा. आयुक्त उदयकुमार शिरूरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्र देऊन आदिवासी गावांमध्ये पाणीसाठवण क्षमता वाढेल, असे तलाव, बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, छोटे बंधारे, रिचार्ज शाफ्ट, विहिरी नूतनीकरण, दुरुस्तीकरण अशी विविध कामे सीएसआरमधून करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. त्यास अनुसरून यंदा ११६ कामे जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांकडून केली जात आहेत.
जिल्ह्यातील ११६ कामांपैकी लघुपाटबंधारे विभागाकडून ५० कामे, विहीर दुरु स्तीसारखी ३६ कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे होणार आहेत. जलसंधारणच्या नियंत्रणातून केटी बंधाºयांसारख्या १० कामांसह छोटे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून १० कामे प्राधान्याने यंदा होतील. या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करून शेतीला देखील मुबलक पाणी देणे शक्य असल्याचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार कामांसाठी यंदा ४४ गावांची निवड
यंदा शहापूर, मुरबाड, भिवंडी या ग्रामीण तालुक्यांसह कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ४४ गावांची निवड झाली आहे. यातील काही गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत, तर २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ आणि २०१६ -१७ साठी १८ गावे निवडली होती. मागील वर्षीदेखील पाण्यासाठी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांचे पाठबळ घेतले होते.
यादरम्यान जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.१७ लाख घनमीटर गाळ काढला होता. याप्रमाणेच यंदाही या योजनेतूनच जिल्ह्यात ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात आली आहेत. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदी जिवंत झाल्याचे आनंद भागवत यांनी यावेळी सांगितले. पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण पाण्याची बचत आपण करू शकतो.
याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे, असे उदयकुमार शिरूरकर यांनी नमूद केले. ठाणे पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्र म, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमांतून जनजागृती केली आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबवणेदेखील शक्य असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

Web Title:  Initiatives of private companies; The severe water scarcity of the villages will be over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे