उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:25 PM2018-09-19T16:25:45+5:302018-09-19T16:27:10+5:30

अर्थसंकल्प मंजुरीला सप्टेंबरचा महिना उजाडणार असेल तर प्रभागातील कामे कधी करायची असा सवाल उपस्थित करीत महासभेत राष्टÑवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

Corporators have announced that the budget is implemented after the delay, when the work done, angry questions | उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

Next
ठळक मुद्देमिनिट्सही वेळेत मिळत नाहीतबजटेचे प्रस्ताव केव्हा होणार तयार

ठाणे - मागील वर्षी प्रमाणेच यंदा सुध्दा महापालिकेचा अर्थसंकल्प उशिराने मंजुर झाल्याने निविदा कधी निघणार कामे कधी करणार असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी  आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला कात्रीत धरले. आता मंजुरी मिळाली असेल तर कामे सुरु होण्यास पुन्हा फेब्रुवारीचा महिना उजाडणार आहे. त्यामुळे पुन्हा निधी स्पील ओव्हरमध्ये जाणार असल्यानेही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी आताच चोख पावले उचलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
                    ठाणे महापालिकेचे २०१७-१८ चे ३०४७.१९ कोंटीचे सुधारीत आणि २०१८-१९ चे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल मार्च महिन्यात महासभेला सादर केले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महासभेत यावर रात्रभर चर्चा रंगली होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंदाजपत्रकावर एकमत होत ३४४.१३ कोटींची वाढ सुचविण्यात येऊन ते मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता २०१८-१९ चे अंदाजपत्रक हे आता ४०३९.२६ कोटींवर गेले आहे.
                                 परंतु अर्थसंकल्प केव्हा मंजुर झाला असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उपस्थित केला. त्यावर लेखा व वित्त अधिकाऱ्यानी ३ एप्रिल २०१८ ला अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्याची दिली. प्रशासनाकडून आलेल्या या उत्तरानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. मग त्याची अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला. अर्थसंकल्प जर मंजुर झाला असेल तर त्याची चर्चा कुठे झाली, कोणत्या कामांचा समावेश करण्यात आला, याची माहिती देण्याची मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. आता जो अर्थसंकल्प मंजुर झालेला आहे, त्यात नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश झाला आहे का? नसेल तर मग दोन दोन दिवस चर्चा करणे काय उपयोगाचे असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. अमंलबजावणीच जर उशिराने होत असेल तर नगरसेवकांची कामे केव्हा होणार, आता बजेट मंजुर झाले तर त्याचे प्रस्ताव केव्हा तयार होणार, त्यावर बजेट केव्हा पडणार, स्थायी आणि महासभेची मंजुरी, पुन्हा निविदा, स्फुटणी कमिटी या फेºयातून निघतांना फेब्रुवारी महिना उजाडणार असेल तर पुन्हा निधी स्पील ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा प्रश्न जगदाळे यांनी उपस्थित केला. यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सारवासारव करीत, नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी वाढवून मिळावा, काही कामांचे नव्याने नियोजन करणे, या सर्वांवर चर्चा करुनच हा अर्थसंकल्प मंजुर होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीसुध्दा नगरसेवकांच्याच कामांसाठी आणि त्यांनी सुचिवलेल्या कामांचा जास्तीत जास्त अंतर्भाव कसा करता येऊ शकतो, यासाठीच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी उशिराने झाल्याचे स्पष्ट केले.
चौकट - महासभेचे मिनिट्स हे प्रत्येक महिन्याला मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयाने सुध्दा त्याबाबत निर्णय दिला आहे. परंतु असे असतांना सुध्दा सहा सहा महिने मिनिट्स उशिराने मिळत असल्यानेच हे सर्व प्रकार घडत असल्याचा मुद्दा नगरसेवक संदीप लेले यांनी उपस्थित केला. त्यामुळे यापुढे किमान मिनिट्स तरी वेळेत मिळावेत अशी आशा नगरसेवकांनी व्यक्त केली.



 

Web Title: Corporators have announced that the budget is implemented after the delay, when the work done, angry questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.