सुबोध भावेने दिली ही माहिती, या महिन्यात संपणार तुला पाहते रे ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:56 PM2019-06-05T12:56:28+5:302019-06-05T13:00:05+5:30

तुला पाहते रे या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. 

subodh bhave said tula pahate re will end in July month | सुबोध भावेने दिली ही माहिती, या महिन्यात संपणार तुला पाहते रे ही मालिका

सुबोध भावेने दिली ही माहिती, या महिन्यात संपणार तुला पाहते रे ही मालिका

googlenewsNext
ठळक मुद्दे येत्या जुलै महिन्यात तुला पाहते रे ही मालिका संपणार असून या मालिकेच्या कथानकाला आता काही रंगतदार वळणं मिळणार आहेत. या मालिकेची कथा ही येवढीच असल्याने ती ताणण्यात काहीही अर्थ नसल्याने ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. 

या मालिकेतील इशा, विक्रम या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. या मालिकतील सुबोधचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत गायत्री दातारची ही पहिला मालिका असली तरी तिने तिच्या अभिनयातातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे खुद्द सुबोध भावेनेच सांगितले आहे. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सुबोधने सांगितले की, येत्या जुलै महिन्यात तुला पाहते रे ही मालिका संपणार असून या मालिकेच्या कथानकाला आता काही रंगतदार वळणं मिळणार आहेत. या मालिकेची कथा ही येवढीच असल्याने ती ताणण्यात काहीही अर्थ नसल्याने ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

तुला पाहते रे ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला खूपच चांगला टिआरपी आहे. या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

ईशाला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसतं. त्यानंतर ईशाचा गोंधळ उडतो पण शेवटी ईशाला आपणच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याची खात्री पटते, तसंच तिच्या आयुष्याचं ध्येय देखील तिला कळतं. राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या मागच्या जन्माची देणी फेडण्यासाठी ईशाचा जन्म झाला आहे हे तिला उमगतं. आता ईशाने जयदीपच्या हाती व्यवसायाची सर्व सूत्रं दिली आहेत तसंच ऑफिसमध्ये परांजपे यांच्या मदतीने ती विक्रांतला धडा शिकवण्यासाठी योजना आखात आहे. 

इशा हीच राजनंदिनी असल्याचे आता इशाला कळले असून तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. इशा हीच राजनंदिनी आहे हे विक्रांतला केव्हा कळणार याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेच्या शेवटी विक्रांतला त्याने केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल का? इशा विक्रांतने केलेल्या कृत्याचा बदला घेईल का या प्रश्नांची उत्तरे काहीच दिवसांत मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. 

Web Title: subodh bhave said tula pahate re will end in July month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.