ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आज आगमन
By Admin | Published: September 1, 2014 10:42 PM2014-09-01T22:42:57+5:302014-09-02T01:10:34+5:30
ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आज आगमन
मनमाड : गणराया पाठोपाठ येणाऱ्या जेष्ठा कनिष्ठा गौरींचे उदया धान्याचे माप ओलांडून सोनपावलांनी आगमन होत असून काही तासांवर येउन ठेपलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घराघरातून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या आनंदात भर टाकनाऱ्या गौरींचे उद्या भाद्रबद शु. अष्टमीला आगमन होत आहे.सायंकाळी ६ वाजून ०७ मिनीटां पर्यंत गौरींची विधीवत स्थापना करण्याचा मुहूर्त आहे. ‘महालक्ष्मी कशाच्या पावला वर ......सोन्याच्या पावलावर ’! अशा जयघोषात जेष्ठा कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन होणार आहे. काही घरांमधे मुखवटयांची स्थापना करण्यात येते तर अनेक घरांमधे उभ्या गौरींची स्थापना करण्यात येते. तिन दिवसांच्या पाहुण्या असलेल्या गौरींचे बुधवारी पुजन करण्यात येणार आहे. सायंकाळी महिला ंसाठी हळदि कुंकवाचे आयोजन करण्यात येते. गुरूवारी गौरींचे विसर्जना साठी दुपारी ४ वाजून १६ मिनीटांपर्यंचा मुहुर्त आहे.